शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार बंदींच्या क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:29 IST

कोल्हापूर : बंदीजनांसाठी राज्यातील कारागृहांची संख्या अपुरी पडू लागल्याने सुमारे पाच हजार बंदीजन क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारणार आहे. हे ...

कोल्हापूर : बंदीजनांसाठी राज्यातील कारागृहांची संख्या अपुरी पडू लागल्याने सुमारे पाच हजार बंदीजन क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारणार आहे. हे कारागृह मुंबईतील चेंबूर-मानखुर्द दरम्यान शासनाच्या महिला व बालकल्याणच्या सुमारे १५ एकर जागेत उभारण्यात येणार आहे, त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असल्याची माहिती राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील २४ हजार बंदींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित ३० टक्के बंदीजनांचे लसीकरणही लवकरच पूर्ण केले जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी कारागृह महानिरीक्षक रामानंद यांनी राज्यातील सर्व कारागृहांची पाहणी व संपर्क दौरा सुरु केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, सध्या विदर्भ, मराठवाड्यातील कारागृहांना भेट देऊन पुणे विभागीय दौरा सुरु केला आहे. राज्यातील सर्वच कारागृहांत ३६ हजार बंदीजन असून, वेळीच उपायोजना केल्याने कारागृहात कोरोनाचा उशिरा शिरकाव झाला. त्या पार्श्वभूमीवर राज्यात दक्षता म्हणून ४२ ठिकाणी तात्पुरती कारागृह उभारली. कोेरोनामुळे गेल्या दीड वर्षात राज्यात ८० बंदींचा तर कोल्हापुरात तिघांचा मृत्यू झाला. राज्यातील कारागृहात बंदींची क्षमतेपेक्षा अधिक संख्या असल्याने भविष्यात नवे कारागृह उभारावे लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईत चेंबूरजवळ सुमारे ५ हजार बंदीजन क्षमतेचे बहुमजली कारागृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. या बहुमजली कारागृहात तळमजल्यावर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे २४ हजार बंदीजनांचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित १२ हजार जणांचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे, असेही ते म्हणाले.

१२ हजार बंदींना पॅरोल रजा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील १२ हजार बंदीजनांना पॅरोल रजा मंजूर केली असून, कोरोनापासून कारागृहच सुरक्षित असल्याने ५३ जणांनी पॅरोल नाकारला असल्याचेही त्यांनी सांगितले.

कारागृहात फाशी यार्डची आवश्यकता नाही

फाशीची शिक्षा होण्याच्या घटना दुर्मीळ आहेत. फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर अंमलबजावणीला बराच काळ जातो. फाशी देण्याचा दुर्मीळ प्रसंग असतो. फाशी यार्ड विभाग नाहक खर्चिक असतो. नागपूर, येरवडा, ठाणे येथील फाशी यार्ड मोडकळीला आले आहेत. फाशीची शिक्षा झालेले सुमारे ५०हून अधिक आरोपी सध्या राज्यातील विविध कारागृहांमध्ये अपिलात असल्याचेही त्यांनी सांगितले.

बंदीचा कॅन्टीन खर्च आता महिना ४५०० रुपये

राज्यातील बंदींना कारागृहातील कॅन्टीनचा खर्च करण्यास यापूर्वी महिना ३,५०० रुपयेपर्यंत मुभा होती, त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तो ४,५०० रुपयेपर्यंत वाढवला आहे. हा खर्च बंदींना आपल्या रोजगारातून अगर नातेवाईकांनी जमा केलेल्या पैशातून केला जाणार आहे.

फोटो नं. १२०७२०२१-कोल-सुनील रामानंद

120721\12kol_4_12072021_5.jpg

फोटो नं. १२०७२०२१-कोल-सुनिल रामानंद