शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

म्हैसाळ आवर्तन बंद होणार!

By admin | Updated: October 4, 2015 23:52 IST

थकबाकी वाढली : पाच कोटींची भर, आठवड्याभरात ‘पॅकअप’ची चिन्हे

मिरज : अवर्षणामुळे दीड महिने सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाच कोटी रुपये वीजबिल आहे. पाणीबिल वसुली नसल्याने आठवड्याभरात म्हैसाळ योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. म्हैसाळचे पाणी जतपर्यंत पोहोचले असून, सध्या सोनी, भोसे, मणेराजुरी परिसरात पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील दहा पंपांसह पाच टप्प्यातील ७३ पंपांव्दारे नदीपात्रातून प्रतिसेकंद १५० क्युसेक्स पाणी उपसा सुरू आहेत. अवर्षण व पाणी टंचाईमुळे दि. २५ आॅगस्टपासून म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. पाणी टंचाईमुळे जतपर्यंत पाणी सोडून व तलाव भरण्यात आले. टंचाई परिस्थितीमुळे दोन महिने म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. पाच टप्प्यातील ७३ पंप सुरू असल्याने व महावितरणने कृषीदरात प्रति युनिट ४४ पैसे दरवाढ केल्याने दीड महिन्यात पाच कोटी रूपये विजबिल झाले आहे. म्हैसाळची सुमारे २० कोटी थकबाकी वसुलीसाठी शेकऱ्यांच्या सात-बारावर बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून लाभक्षेत्रातील पिकांची मोजणी सुरू आहे. नवीन वीजबिलामुळे थकबाकी २५ कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात पाऊस झाल्याच्या कारणावरून म्हैसाळचे आवर्तन बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सक्तीने थकबाकी वसुलीच्या पाटबंधारेच्या निर्णयामुळे संघर्षाची चिन्हे आहेत. योजना बंद करण्यात येऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)सुरुवातीपासूनच सतावतोय पाणीपट्टीचा प्रश्न...म्हैसाळ योजनेच्या सुरुवातीपासूनच अपूर्ण कालवे व थकित पाणीपट्टीचा प्रश्न सतावत आहे. गेल्या दहा वर्षातील म्हैसाळ योजनेतील आवर्तनावर नजर टाकली असता, केवळ राजकीय दबावाखाली आणि टंचाई निधीच्या भरवशावरच रडतखडत का होईना, योजना सुरू असल्याचे दिसून येते. मुळात या योजनेची मुहूर्तमेढ रोवताना, ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली योजना’, अशी संकल्पना होती. मात्र, वाढलेला राजकीय हस्तक्षेप व योजनेच्या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील राजकारण फिरत असल्याने, पूर्ण क्षमतेने योजना चालविण्यात अडचणी येत आहेत. त्यात योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने पाण्याचा वापर न करताच थकबाकी सात-बारावर येण्याची वेळ लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना अंशत: का होईना, म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत आहे. या तालुक्यांतील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सद्य स्थितीला ३२ हजार हेक्टरला पाण्याचा लाभ होत आहे.