शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ आवर्तन बंद होणार!

By admin | Updated: October 4, 2015 23:52 IST

थकबाकी वाढली : पाच कोटींची भर, आठवड्याभरात ‘पॅकअप’ची चिन्हे

मिरज : अवर्षणामुळे दीड महिने सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाच कोटी रुपये वीजबिल आहे. पाणीबिल वसुली नसल्याने आठवड्याभरात म्हैसाळ योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. म्हैसाळचे पाणी जतपर्यंत पोहोचले असून, सध्या सोनी, भोसे, मणेराजुरी परिसरात पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील दहा पंपांसह पाच टप्प्यातील ७३ पंपांव्दारे नदीपात्रातून प्रतिसेकंद १५० क्युसेक्स पाणी उपसा सुरू आहेत. अवर्षण व पाणी टंचाईमुळे दि. २५ आॅगस्टपासून म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. पाणी टंचाईमुळे जतपर्यंत पाणी सोडून व तलाव भरण्यात आले. टंचाई परिस्थितीमुळे दोन महिने म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. पाच टप्प्यातील ७३ पंप सुरू असल्याने व महावितरणने कृषीदरात प्रति युनिट ४४ पैसे दरवाढ केल्याने दीड महिन्यात पाच कोटी रूपये विजबिल झाले आहे. म्हैसाळची सुमारे २० कोटी थकबाकी वसुलीसाठी शेकऱ्यांच्या सात-बारावर बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून लाभक्षेत्रातील पिकांची मोजणी सुरू आहे. नवीन वीजबिलामुळे थकबाकी २५ कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात पाऊस झाल्याच्या कारणावरून म्हैसाळचे आवर्तन बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सक्तीने थकबाकी वसुलीच्या पाटबंधारेच्या निर्णयामुळे संघर्षाची चिन्हे आहेत. योजना बंद करण्यात येऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)सुरुवातीपासूनच सतावतोय पाणीपट्टीचा प्रश्न...म्हैसाळ योजनेच्या सुरुवातीपासूनच अपूर्ण कालवे व थकित पाणीपट्टीचा प्रश्न सतावत आहे. गेल्या दहा वर्षातील म्हैसाळ योजनेतील आवर्तनावर नजर टाकली असता, केवळ राजकीय दबावाखाली आणि टंचाई निधीच्या भरवशावरच रडतखडत का होईना, योजना सुरू असल्याचे दिसून येते. मुळात या योजनेची मुहूर्तमेढ रोवताना, ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली योजना’, अशी संकल्पना होती. मात्र, वाढलेला राजकीय हस्तक्षेप व योजनेच्या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील राजकारण फिरत असल्याने, पूर्ण क्षमतेने योजना चालविण्यात अडचणी येत आहेत. त्यात योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने पाण्याचा वापर न करताच थकबाकी सात-बारावर येण्याची वेळ लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना अंशत: का होईना, म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत आहे. या तालुक्यांतील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सद्य स्थितीला ३२ हजार हेक्टरला पाण्याचा लाभ होत आहे.