शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

म्हैसाळ आवर्तन बंद होणार!

By admin | Updated: October 4, 2015 23:52 IST

थकबाकी वाढली : पाच कोटींची भर, आठवड्याभरात ‘पॅकअप’ची चिन्हे

मिरज : अवर्षणामुळे दीड महिने सुरू असलेल्या म्हैसाळ योजनेचे पाच कोटी रुपये वीजबिल आहे. पाणीबिल वसुली नसल्याने आठवड्याभरात म्हैसाळ योजना बंद होण्याची चिन्हे आहेत. म्हैसाळचे पाणी जतपर्यंत पोहोचले असून, सध्या सोनी, भोसे, मणेराजुरी परिसरात पाणी सोडण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील दहा पंपांसह पाच टप्प्यातील ७३ पंपांव्दारे नदीपात्रातून प्रतिसेकंद १५० क्युसेक्स पाणी उपसा सुरू आहेत. अवर्षण व पाणी टंचाईमुळे दि. २५ आॅगस्टपासून म्हैसाळ योजना सुरू करण्यात आली. पाणी टंचाईमुळे जतपर्यंत पाणी सोडून व तलाव भरण्यात आले. टंचाई परिस्थितीमुळे दोन महिने म्हैसाळचे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार होते. पाच टप्प्यातील ७३ पंप सुरू असल्याने व महावितरणने कृषीदरात प्रति युनिट ४४ पैसे दरवाढ केल्याने दीड महिन्यात पाच कोटी रूपये विजबिल झाले आहे. म्हैसाळची सुमारे २० कोटी थकबाकी वसुलीसाठी शेकऱ्यांच्या सात-बारावर बोजा नोंद करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून लाभक्षेत्रातील पिकांची मोजणी सुरू आहे. नवीन वीजबिलामुळे थकबाकी २५ कोटींवर पोहोचणार आहे. त्यामुळे लाभक्षेत्रात पाऊस झाल्याच्या कारणावरून म्हैसाळचे आवर्तन बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. म्हैसाळच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र सक्तीने थकबाकी वसुलीच्या पाटबंधारेच्या निर्णयामुळे संघर्षाची चिन्हे आहेत. योजना बंद करण्यात येऊ नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (वार्ताहर)सुरुवातीपासूनच सतावतोय पाणीपट्टीचा प्रश्न...म्हैसाळ योजनेच्या सुरुवातीपासूनच अपूर्ण कालवे व थकित पाणीपट्टीचा प्रश्न सतावत आहे. गेल्या दहा वर्षातील म्हैसाळ योजनेतील आवर्तनावर नजर टाकली असता, केवळ राजकीय दबावाखाली आणि टंचाई निधीच्या भरवशावरच रडतखडत का होईना, योजना सुरू असल्याचे दिसून येते. मुळात या योजनेची मुहूर्तमेढ रोवताना, ‘शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली योजना’, अशी संकल्पना होती. मात्र, वाढलेला राजकीय हस्तक्षेप व योजनेच्या पाण्यावर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील राजकारण फिरत असल्याने, पूर्ण क्षमतेने योजना चालविण्यात अडचणी येत आहेत. त्यात योजनेचे पोटकालवे अपूर्ण असल्याने पाण्याचा वापर न करताच थकबाकी सात-बारावर येण्याची वेळ लाभक्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना अंशत: का होईना, म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा लाभ मिळत आहे. या तालुक्यांतील ८१ हजार ६९७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट असणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून सद्य स्थितीला ३२ हजार हेक्टरला पाण्याचा लाभ होत आहे.