शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अपहारानंतर कागदपत्रेच गहाळ

By admin | Updated: January 29, 2015 23:54 IST

अधिकाऱ्यांचीही मेहरनजर : उपठेकेदारही नात्यातीलच, दप्तरसाठी कपाट फोडावे लागले

भीमगोंडा देसाई-कोल्हापूर -सातवे (ता. पन्हाळा) येथील जलस्वराज्य योजनेतील कागदपत्रे गहाळ झाल्याने किती अनियमितता आणि अपहार झाला हे स्पष्ट होत नाही, असा स्पष्ट अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे. यावरून आवश्यक कागदपत्रे गैरकारभार चव्हाट्यावर येणार म्हणूनच गहाळ केल्याचा संशय आता बळावत आहे. कागदपत्रे गहाळ होण्यात काही अधिकारी, कर्मचारी यांचीही ‘मेहरनजर’असल्याचे बोलले जात आहे.
योजनेचे कामकाज पारदर्शक व्हावे, याकडे लक्ष देण्याची जबाबदारी तत्कालीन सरपंच सुमन सतीश नांगरे, ग्रामसेवक एच. जी. निरूखे यांची पहिली जबादारी होती. नियमानुसार आणि पारदर्शकपणे काम होते, की नाही हे पाहण्याचे काम जिल्हा परिषदेमधील अधिकाऱ्यांचे होते. परंतु, राजकीय आश्रय, कर्मचारी ते अधिकारी यांनी ‘सगळं काम समितीचे’, ‘ते गावानेच करायचे आहे’, असा सोयीस्करपणे युक्तिवाद करत जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षाने योजना वादग्रस्त ठरली.
ढपला मारलेला आणि टक्केवारीची मलई बाहेर येणार म्हणून कागदपत्रे गहाळ केल्याचा आरोप तक्रारदार उत्तम नंदूरकर यांचा आहे. कागदपत्रे कोणाकडे आहेत याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळया स्तरांवर चौकशी झाली. विविध समितीचे अध्यक्ष, सचिव व तत्कालीन ग्रामसेवकांनी तपास अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवले. जबाबात प्रत्येकजण कागदपत्रे सांभाळायचे काम माझे कसे नाही, हे सांगितले आहे. कागदपत्रे सांभाळण्यापेक्षा आपल्या वाटणीची टक्केवारी कशी मिळेल याकडेही ‘काहीं’नी अधिक रस दाखविला. परिणामी योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले.
३१ आॅगस्ट २०१० ते ३१ आॅगस्ट २०११ कालावधित सरपंच म्हणून काम केलेले संजय दळवी यांनी आपल्या लेखी जबाबात म्हटले आहे, अभिलेख हस्तांतरणाचा (योजनेची कागदपत्रे) कागद खोटा आहे. त्याच्यावरील ठराव २५ नोव्हेंबर २००९ च्या ग्रामसभेतील नाही. हस्तांतराचा कागदच बोगस आहे. ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळण्याचे काम ग्रामसेवकाचे आहे. योजना पूर्ण झाल्यानंतरही पाणी वाड्यांना मिळत नाही. परिणामी जलस्वराज्य योजना कुचकामी ठरली. त्यामध्ये मोठा अपहार झाला आहे. विविध विभागांतील खर्च बोगस आहे.
दरम्यान, ज्यांना ‘आर्थिक मेवा’ मिळाला आहे. त्यांनी जबाबात योजना कशी यशस्वी झाली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु चौकशी अहवालात वाळकेवाडी, शिंदेवाडी ग्रामस्थांना अजूनही पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते, हे उघड झाले आहे. यावरून योजना फेल झाली आहे हे जगजाहीर आहे. राज्यात, तालुक्यात राजकीय वजन होते, त्यावेळी आमचे कोणीही काही करू शकत नाही, अशा अविभार्वात वावरणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही प्रमाणात का असेना धडा मिळाला आहे. (क्रमश:)

तत्कालीन अध्यक्ष, सचिवच जबाबदार
समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी मुख्य ठेकेदाराचा मृत्यू झाल्यानंतर उपठेकेदार नेमले. ते तत्कालीन अध्यक्ष, सरपंचांचे भाऊ आहेत. त्यामुळे नात्यातील लोकांनी संगनमताने हा गैरव्यवहार केल्याचे बोलले जात आहे. १३ आॅगस्ट २०१४ रोजी ग्रामपंचायतीमधील कपाट फोडून दप्तर बाहेर काढले. मात्र, मुख्य कागदपत्रांचे दप्तर मिळालेले नाही. त्यास अध्यक्ष व सचिवच जबाबदार आहेत, असेही जबाबात माजी सरपंच संजय दळवी यांनी म्हटले आहे. योजनेचे कसे ‘बारा वाजविले’ हे समजण्यासाठी हा जबाबच पुरेसा आहे.