शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

सुधारकांच्या संघर्षातून स्त्रीुमक्तीचा वाटचाल  : मेघा पानसरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 19:04 IST

स्फोटक परिस्थितीत क्रांतीकारकांच्या विचारांचा हात हातात घेवून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यादृष्टीने स्त्री समाजसुधारक हे पुस्तक विचारांची डायरी आहे असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी मंगळवारी केले.

ठळक मुद्देसुधारकांच्या संघर्षातून स्त्रीुमक्तीचा वाटचाल  : मेघा पानसरे स्त्री समाज सुधारक पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर : इतिहासातील स्त्री समाजसुधारकांनी केलेल्या संघर्षातूवन स्त्रीमुक्तीची वाटचाल सुरू आहे, महिला आपले अस्तित्व निर्माण करत आहेत. स्त्री सन्मानाचा हा संघर्ष अजूनही सुरू असताना काळाची पावलं पुन्हा हिंदू राष्ट्र, सनातनी प्रवृत्ती, धर्म-राजकारण आणि स्त्री दमनाच्या प्रतीगामी दिशेने पडत आहेत. या स्फोटक परिस्थितीत क्रांतीकारकांच्या विचारांचा हात हातात घेवून आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. त्यादृष्टीने स्त्री समाजसुधारक हे पुस्तक विचारांची डायरी आहे असे प्रतिपादन डॉ. मेघा पानसरे यांनी मंगळवारी केले.शाहू स्मारक भवनच्या मिनी हॉलमध्ये सांगलीच्या संग्राम संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात स्त्री समाजसुधारक या पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्यवाह मीना सेशु होत्या. यावेळी लोकमतचे संपादक वसंत भोसले, सामाजिक कार्यकर्ते धनाजी गुरव, प्रशांत नागावकर, युवराज जाधव उपस्थित होते.मेघा पानसरे म्हणाल्या, जाती आणि धर्माच्या उतरंडीच्या काळात बसवण्णा, शिवाजी महाराज, शाहु महाराज, फुले, आंबेडकर अशा समाजधुरिणांनी स्त्रीयांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. पण महिलांचा संघर्ष आजच्या २१ व्या शतकातही सुरू आहे. महान संस्कृतीच्या नावाखाली हिंदू राष्ट्राची पायाभरणी सुरु आहे.

संविधानाच्या ज्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांवर देश जिवंत आहे, ज्यामुळे आपण सनातन्यांना प्रश्न विचारू शकतो ते स्वातंत्र्य गमावण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यांच्याशी संघर्ष करून आपले दु:ख नाहीसे करण्यासाठी आपण हातात हात घालून पुढे जावू या.मीना सेशू म्हणाल्या, संवेदनशिलता आणि प्रामाणिकता ही स्त्रीची शक्ती आहे. निसर्गाने मानवाच्या मेंदूची रचना करताना स्त्री-पुरुष असा भेद केलेला नाही. आपण मात्र अजूनही जातीभेद आणि लिंगभेद करून माणसाचं डोकं भ्रष्ट करतोय.

पुरुषप्रधान आणि पितृसत्ताक पद्धतीने स्त्रीला दुय्यम स्थान दिले आहे. आम्ही हे सनातनी विचार बदलू, पुढचं पाऊल टाकत नव्या विचारांच्या समाजाची निर्मिती करू त्यासाठी ही पुस्तिका दिशादर्शक ठरेल.धनाजी गुरव यांनी जाती व्यवस्था आणि मनुस्मृतीने स्त्रीच्या आयुष्यात दुख निर्माण केले आहे. त्या दुखाची कारणमिमांसा आणि येणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची नवी दृष्टी स्त्री समाजसुधारक पुस्तिकेतून मिळते असे मत व्यक्त केले.यावेळी सुधा पाटील या तृतीयपंथीयाने त्यांना समाजाकडून मिळत असलेल्या वागणुकीचे वास्तव मांडले. प्रशांत नागावकर, युवराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. किरण देशमुख यांनी सुत्रसंचलन केले. संगिता भिंगारदिवे यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Womenमहिलाkolhapurकोल्हापूर