शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

...तर आरक्षणासाठी मुंबईची कोंडी करणार ४ सप्टेंबरला ‘गाडी मार्च’ : सकल मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 00:56 IST

या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

कोल्हापूर : या महिनाअखेर मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा न केल्यास ५ सप्टेंबर रोजी मुंबईला धडक मारण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. हजारो चारचाकी वाहने आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत जाऊन तेथे शहराचीच कोंडी केल्याशिवाय सरकार जागे होणार नाही; म्हणूनच हा ‘गाडी मार्च’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील विविध संघटना, कार्यकर्त्यांच्या येथे झालेल्या दिवसभराच्या बैठकीनंतर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि महसूलमंत्री विशेष अधिवेशन घेणार, असे सर्वत्र सांगत आहेत. त्यांनी ३१ आॅगस्टच्या आत ही तारीख जाहीर करावी. आमच्या मागण्यांबद्दल अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी, मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी आर्थिक तरतूद काय केली हे सांगावे. अन्यथा ४ सप्टेंबरला कोल्हापुरातील दसरा चौकातून मुंबईकडे ‘गाडी मार्च’ निघेल.

या मार्चदरम्यान कार्यकर्ते विविध जिल्ह्यांतील हजारो गाड्या घेऊन सहभागी होणार आहेत. मात्र, मुंबईत आम्हांला अडविल्यास बेमुदत आंदोलन सुरू करणार आहोत. जर आरक्षण देणे जमणार नसेल तर आम्ही नालायक आहोत, असे सांगून सरकारने पायउतार व्हावे.शासनाच्या भूमिकेबाबत सावंत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन महिन्यांपूर्वी हे प्रकरण न्यायालयात आहे, असे सांगत होते. परळी, कोल्हापूर येथे आंदोलने सुर झाल्यानंतर राज्य मागासवर्गीय अहवालाचे कारण पुढे करण्यात आले. मात्र आरक्षण कसे देणार आहे, हे अजूनही या दोघांनीही सांगितलेले नाही.

वसंतराव मुळीक म्हणाले, जरी आम्ही मुंबईला आंदोलनासाठी गेलो तरी दसरा चौकातील आंदोलन आमच्या मराठमोळ्या महिला नेटाने पुढे चालविणार आहेत. १000 गाड्या आत्ताच तयार असल्याचे हर्षल सुर्वे यांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान मंत्रालयाला घेराव घालावा, स्टॉक एक्स्चेंजचे काम बंद पाडावे, अशा सूचना कार्यकर्त्यांनी बैठकीत केल्या. यावेळी चंद्रकांत पाटील, प्रज्ञा जाधव, मुंबई; प्रवीण पाटील, सांगली, प्रा. नानासाहेब धाटे, कर्जत, अहमदनगर; निखिल जाधव, सातारा, प्रवीण जाधव, वाई यांच्यासह कोल्हापूरचे कार्यकर्ते उपस्थित होते.इतर मागास कोट्यातूनच आरक्षण हवेसावंत म्हणाले, आम्हीही आता अभ्यास केला आहे. गुज्जर, जाट यांचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही; त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास कोट्यामधूनच आरक्षण दिले तरच ते टिकू शकते. तेव्हा याच पद्धतीने आम्हाला आरक्षण पाहिजे. आता तहात हरण्याची आमची मन:स्थिती नाही.‘गेटवे आॅफ इंडिया’वर ठिय्या आंदोलनदिलीप देसाई म्हणाले, गेटवे आॅफ इंडियावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवरायांना वंदन करून आम्ही तेथे बसणार आहोत. शासन ऐकत नसल्याने मराठा आरक्षणाबाबत ग्रामपंचायतींनी केलेले सर्व ठराव आम्ही समुद्राला अर्पण करणार आहोत.श्रीमंत शाहू महाराजांची गाडी पहिलीमुंबईकडे जाणाऱ्या मार्चमध्ये माझी गाडी सर्वांत पुढे असेल, असा शब्द श्रीमंत शाहू महाराजांनी आम्हाला दिल्याचे यावेळी इंद्रजित सावंत यांनी सांगितले. याच पद्धतीने आता भाषणे करणाºया सर्वच नेत्यांनी आपल्या गाड्या मार्चच्या पुढे लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा