मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ यांचा एनआयएला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 07:11 PM2021-06-18T19:11:28+5:302021-06-18T19:13:08+5:30

Politics Hasan Musrif Kolhapur : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुलीनिर्देश केले आहेत. दोन्ही घटनांचा तपास म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पत्रकार परिषदेत केला.

Is the Mansukh Hiren case a five year plan? - Mushrif's question to NIA | मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ यांचा एनआयएला सवाल

मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ यांचा एनआयएला सवाल

Next
ठळक मुद्देमनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का?-मुश्रीफ परमबीर सिंग हेच ॲन्टिलया प्रकरणाचे मास्टर माइंड

कोल्हापूर : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुलीनिर्देश केले आहेत. दोन्ही घटनांचा तपास म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का? असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर शहरातील थेट पाईपलाईन आढावा बैठकीनंतर शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, मनसुख हिरेन हत्या व ॲन्टेलियासमोरील सापडलेली स्फोटक प्रकरणात ह्यएनआयएह्णने प्रदीप शर्माला अटक केली. मात्र, या सगळ्यांचा मास्टर माइंड अजून मोकाट आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याशिवाय एवढे मोठे धाडस कोणी करू शकत नाही. या प्रकरणाचा तपास दुसऱ्या बाजूने वळवण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून परमबीर सिंगांनी पत्र दिले. त्यामुळे माझे अजूनही म्हणणे, या प्रकरणातील मास्टर माइंड ह्यएनआयएह्णने महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणला पाहिजे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीराजेंनी राज्य सरकारच्या ट्रपमध्ये अडकू नये, असे आवाहन केले होते. याबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, मराठा आरक्षण व राज्याच्या पातळीवरील मागण्यांबाबत खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली आहे. राज्याच्या अखत्यारितील सर्व मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिलेले आहे. मग हा ट्रॅप कसला?

 

Web Title: Is the Mansukh Hiren case a five year plan? - Mushrif's question to NIA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.