शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनापूर्वीच आंबेओहोळची घळभरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:44 IST

आजरा : आधी पुनर्वसन, मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात आंबेओहळ धरणाचे घळभरणीचे काम सुरू करणाऱ्या शासनाचा ...

आजरा : आधी पुनर्वसन, मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात आंबेओहळ धरणाचे घळभरणीचे काम सुरू करणाऱ्या शासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजऱ्यात झालेल्या धरणग्रस्तांच्या बैठकीत हा निषेध करण्यात आला.

महाराष्ट्रातील धरणग्रस्त स्त्री-पुरुषांनी लढून शासनाला पुनर्वसनाचा कायदा करायला भाग पाडले. ज्यांची घरे, जमिनी, गावे, उद्‌ध्वस्त झाली आहेत अशा लोकांना विकासामध्ये न्याय्य वाटा मिळाला पाहिजे, ही न्याय भूमिका यामागे होती. पुढे आधी पुनर्वसन, मग धरण हा कायदा लढ्यातून अस्तित्वात आला. हा कायदा अस्तित्वात असताना पुनर्वसनाचे काम तसेच ठेवून धरणाच्या घळभरणीचे काम चालू करणे हे धरणग्रस्तांवर अन्याय करणारे आहे.

महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य आहे की बेबंदशाही आहे, असा आमचा प्रश्न आहे. कोणातरी व्यक्तीच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसाठी धरणग्रस्तांचा बळी दिला जात असेल तर आम्ही त्याचा संवैधानिक मार्गाने सनदशीरपणे विरोध करू.

महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला दडपून तिचा आवाज बंद करून प्रकल्प उभे केले जातील. या भ्रमात पाटबंधारे खाते शासन-प्रशासनासह कोणीही राहू नये. कष्टकरी जनता योग्य वेळी त्यांचा भ्रमनिरास केल्याशिवाय राहणार नाही, यावर आमचा विश्वास आहे.

बैठकीस कॉ. संपत देसाई, दशरथ घुरे, प्रकाश मोरस्कर, शंकर पावले, नारायण भडांगे, विजय पाटील, भीमराव माधव, भिकाजी पाटील, हरी सावंत, श्रावण पवार, नारायण राणे, विष्णू मांजरेकर उपस्थित होते.