शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha 2019: 'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 13:27 IST

बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागल विधानसभा लढवली आहे. आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.

ठळक मुद्दे'बाळासाहेब हे दैवत; उमेदवारी मिळाली नाही तरी बंडखोरी करणार नाही!'संजयबाबा घाटगे मुरगूड मधून फुंकणार रणसिंग

मुरगूड : बाळासाहेब ठाकरे हे आपले दैवत आहेत.अडचणीच्या काळात आपण शिवसेनेतून कागलविधानसभा लढवली आहे.आतापर्यंत आपण पक्षाशी एकनिष्ठ आहोत.त्यामुळे या वेळी ही कागल मधून सेना भाजपा युतीच्या उमेदवारी साठी आग्रही आहे.आणि उमेदवारी मिळण्यात कोणतीही अडचण नाही पण तरीही काही वेगळा निर्णय झाला तरी आपण युती धर्म पाळून पक्षाचा आदेश अंतिम मानेन जर युतीची उमेदवारी मिळाली तरच आपण किंवा अमरीश रिंगणात राहू अन्यथा आपण निवडणूक लढणार नाही असे स्पष्ट मत माजी आमदार संजय घाटगे यांनी दिले.

शिवसेनेचा महाराष्ट्रातील पहिला मी महाराष्ट्र निश्चय मेळावा मुरगूड ता कागल येथे पार पडणार आहे याची माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली.

या कार्यक्रमासाठी मुंबई येथील सेना भवनातून एक टीम मुरगूड मध्ये आली असून या निश्चय मेळाव्यातून शिवसेना विधानसभेचे रणसिंग फुंकणार आहे.आणि हा मेळावा कागल तालुक्यातील मुरगूड मध्ये पार पडणार असल्याने कागल ची उमेदवारी सेनेलाच मिळणार असल्याचे संकेत या पत्रकार परिषदेत दिसत होते.तसा पक्षाने ग्रीन सिग्नल दिल्याचे ही संजय घाटगे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना संजय घाटगे म्हणाले आपल्या वंचित आघाडीशी संपर्क झाल्याची बातमी तशी खोडकर च होती.असा कोणताही संपर्क झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आदित्य ठाकरे हेच महाराष्ट्राचे भवितव्य आहे.त्यामुळे उमेदवारी मिळो अगर न मिळो आपण शिवसेना सोडण्याच्या प्रश्नच येत नाही असे त्यांनी सांगितले.

जर भाजपा सेना युती झाली नाही तर पक्षाने जबाबदारी दिली तर आपण खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्याने सेनेकडून लढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.तर युती कडून आपल्याला उमेदवारी मिळाली तर भाजपकडून इच्छुक असणारे समरजीत घाटगे यांची समजूत काढण्यात वरिष्ठ नेते यशस्वी होतील असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

वरिष्ठ नेत्यांना आणून उमेदवारी मिळावी यासाठी आपण कधीच प्रचंड पैसा खर्च केला नसता आणि करणार नाही कारण आमचे दैवत सर्वसामान्य जनता आहे त्यांचा उत्कर्ष महत्वाचा आहे संस्थेचा पैसा हा संस्थेसाठी किंवा जनतेसाठीच खर्च होणे अपेक्षित आहे राजकारणावर खर्च होणे हे आपल्याला पटत नाही असे सांगून कागल मध्ये झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यांची त्यांनी खिल्ली उडवली.मागील निवडणुकीत भाजपला तालुक्यात पाच हजार मते पडली आणि आम्हाला साधारण सव्वालाख मते पडली त्यामुळे पक्ष नेतृत्वाला याची माहिती असल्याने कागलची जागा आम्हालाच मिळेल असे सांगून मी काय अमरीश याचा निर्णय पक्ष प्रमुख ठाकरेंच घेतील असे त्यांनी सांगितले.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार रविवारी होणाऱ्या मुरगुड मधील मेळाव्यात नितीन बानूगडे पाटील हे प्रमुख वक्ते असतील तर खासदार संजय मंडलिक हे अध्यक्ष असतील जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील सेने चे सर्व नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार असून मुरगूड विद्यालयाच्या जवळ हा मेळावा सांयकाळी चार वाजता पार पडणार आहे.

 स्वागत नामदेवराव मेंडके यांनी केले.यावेळीअमरीश घाटगे, उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, जयसिंग भोसले,धनराज घाटगे,ए.वाय. पाटील,अशोक पाटील,के.के.पाटील, एम.बी.पाटील,महेश देशपांडे,दिलीप पाटील,पंडित बोभाटे, महेश पाटील,रणजित शिंदे,सुशांत पाटील,आदी प्रमुख उपस्थित होते.

 मुरगूड ता.कागल येथे बोलताना माजी आमदार संजय घाटगे,उपनगराध्यक्ष धनाजी गोधडे, नामदेवराव मेंडके, धनराज घाटगे आदी प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkagal-acकागलkolhapurकोल्हापूर