शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
2
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
3
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
4
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
5
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
6
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
7
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
8
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
9
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
10
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
11
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
12
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
13
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
14
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
15
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
16
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
17
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
18
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
19
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
20
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र

Kolhapur- Gokul Dudh Sangh: संचालक पदाची खिरापत वाटून मते मिळत नाहीत, महादेवराव महाडिकांचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 13:02 IST

मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेत

कोल्हापूर : मोठा गाजावाजा करत पारदर्शक कारभाराच्या गप्पा मारत ‘गोकुळ’ची सत्ता घेतली. चार वर्षांत चांगला कारभार केल्याचा डांगाेरा पिटता तर मग तुम्हाला ‘टाेकन’ देण्याची वेळ का आली, असा सवाल करत मंत्री, आमदारांनी ‘टोकन’चा पाडलेला पायंडा चुकीचा असल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.संचालकपदांची संख्या वाढविण्यामागे दूध उत्पादकांचे हित काय? संचालकपदाची खिरापत वाटून मते मिळत नसल्याचा टोलाही त्यांनी संघाचे व महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.महाडिक म्हणाले, कोणत्याही सहकारी संस्थेत विश्वासाने काम केले तर निवडणुकीत प्रलोभनाची गरज नसते. मात्र, ‘गोकुळ’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘टोकन’ दिले जात आहे. त्यासाठी मंत्री, आमदार हे सुद्धा फिरत आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादक स्वाभिमानी आहे, तुम्ही चांगले काम केले तर तुमच्यासोबत तो डोळे झाकून राहतो.राजकीय सोयीसाठी संचालकांची संख्या २५ करणे हे कितपत योग्य आहे. संचालकांचा खर्च वाढणार त्यामध्ये दूध उत्पादकांचा काय फायदा? दूध उत्पादकांच्या घामावर ‘गोकुळ’ मोठा झाला, त्याचे श्रेय कोणी घेऊ नये.मुश्रीफ यांनी बाहेर राहून ‘बिनविरोध’चे प्रयत्न करावेतकेडीसीसी बँकेची निवडणूक वेगळी असते, त्या धर्तीवर कोणी प्रयत्न करणार असल्याचे समजते. त्यासाठी जागा वाढवण्याचा खटाटोप कोण करत असेल तर ते अशक्य आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना प्रक्रियेत राहून बिनविरोध करता येणे शक्य नाही, त्यांनी बाहेर राहून हे प्रयत्न करावेत, असेही महाडिक यांनी सांगितले.जाजम, घड्याळ खरेदीची निविदा काढली का?हीरकमहोत्सवानिमित्त संघाने दूध संस्थांना जाजम व घड्याळ दिले. साडेचार कोटींची खरेदी करताना निविदा काढली का? एका दिवसात संबंधिताला पैसे दिल्याचा आरोप महाडिक यांनी केला.

महायुती म्हणून सोबत..महायुती म्हणून सगळे एकत्र राहूया, पण प्रत्येक माणसाला स्वत:प्रमाणेच किंमत देत त्याचा मान राखला पाहिजे. त्याचे भानही सगळ्यांनी ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना दिला.

‘आयकर’ परताव्याचे ३२ कोटी काय झाले?आमच्या काळात आयकर विभागाने ३२ कोटींचा दंड केला होता. त्याविरोधात आम्ही कायदेशीर लढाई सुरू केली होती. ती संघाच्या बाजूने झाली, संबंधित विभागाने संघाला ३२ कोटी रुपये दिले त्याचे काय झाले? गेल्या आर्थिक वर्षात १४२ काेटी ठेवी दाखविल्या वर्षभरात त्या ५१२ कोटींपर्यंत कशा पोहोचल्या? असा सवालही महाडिक यांनी केला.