शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 4:54 PM

Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले.

ठळक मुद्देजाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळाल्यापासून केवळ १३ दिवसात आमदार होण्याचा मान मिळाला.

कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हॅट्रीकला लगाम घालत कॉँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी पहिल्याच दणक्यात विजयी गोलची नोंद करीत ‘कोल्हापूर उत्तर’मध्ये तब्बल दहा वर्षांनी कॉँग्रेसचा झेंडा फडकावला. शिवसेनेत क्षीरसागर यांच्याबद्दल असलेल्या असंतोषाचा फायदा उठवत आणि कॉँग्रेस - राष्टÑवादीची मोट बांधत चंद्रकांत जाधव यांनी १५ हजार १९९ इतक्या मताधिक्याने विजय संपादन केला. जाधव यांना कॉँग्रेसचे तिकीट मिळाल्यापासून केवळ १३ दिवसात आमदार होण्याचा मान मिळाला.

कोल्हापूर उत्तर मतदार संघात झालेल्या १ लाख ७५ हजार ३२५ मतदानापैकी चंद्रकांत जाधव यांना ९१ हजार ०५३ तर राजेश क्षीरसारग यांना ७५ हजार ८५४ इतक ी मते मिळाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सतिशचंद्र कांबळे (१४८३ मते), वंचित आघाडीच्या राहूल राजहंश (११५४ मते) यांचा या निवडणुकीत दारुण पराभव होऊन डिपॉझिट सुध्दा जप्त झाली.

मतमोजणीच्या अगदी पहिल्या फेरीपासून चंद्रकांत जाधव आघाडीवर होते. पहिल्या फेरीत त्यांना ३९०० चे मताधिक्य मिळाले. तेथून त्यांच्या विजयाची घोडदौड सुरु झाली. नवव्या फेरीपर्यंत त्यांचे मताधिक्य १२ हजाराच्या पुढे गेले आणि त्याचवेळी त्यांच्या विजयाची खात्री झाली. प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले.

जाधव यांना मतदार संघातील कसबा बावडा, लाईनबाजार, सदर बाजार, विचारेमाळ, कदमवाडी, जाधववाडी, रुईकर कॉलनी, ताराबाई पार्क, शाहूपुरी, महाराणा प्रतापचौक, अकबर मोहल्ला, गंजीमाळ, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी सुसरबाग, वरुणतिर्थ राजारामपुरी, मातंगवसाहत या भागात मताधिक्य मिळाले आहे. तर राजेश क्षीरसागर यांना शुक्रवारपेठ, शाहू उद्यान, बाबुजमाल, उत्तरेश्वर, खोलखंडोबा, सिध्दार्थनगर, भवानी मंडप आदी भागात चांगली मते मिळाली. गेल्या दोन निवडणुकीत क्षीरसागर यांना बावडा, शिवाजी पेठ या भागात मोठे मताधिक्य मिळाले होते, याच भागात जाधव यांनी सुरुंग लावून त्यांचे मतदान फोडले. ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, टाकाळा, साईक्स, उद्यमनगर या भागात दोघांनाही पन्नास पन्नास टक्के मते मिळाली.

  • क्षीरसागर यांना नाराजी नडली

निवडणुक जाहीर झाल्यापासून ‘क्षीरसागर नकोत’एवढी एकच भावना विविध घटकात निर्माण झाली होती. त्यामुळे हे सर्व घटक पहिल्या दिवसापासून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या पराभवासाठी कामाला लागले होते. भीमा कोरेगांव दंगलीवेळची वादग्रस्त भूमिकाही त्यांना चांगलीच भोवली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूकcongressकाँग्रेसkolhapur-pcकोल्हापूर