शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

कोल्हापूर विभागातील ३४ हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 13:28 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या खातेदारांच्या संख्येत सांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देएकूण अर्जदारांच्या ५ टक्केच खातेदारांना लाभसांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र अपात्र कर्जमाफीचा धसका!

राजाराम लोेंढे

 कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या खातेदारांच्या संख्येत सांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जून महिन्यात राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण आॅनलाईन अर्ज दाखल करण्यापासून कर्जमाफी योजना वादाच्या भोवऱ्यात आडकली आहे. कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सरकारने अनेक तारखा सांगितल्या, पण अद्याप सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेलाच नाही.

आतापर्यंत दोन ग्रीन याद्यांच्या माध्यमातून खातेदारांची नावे व त्यांच्या रकमा बँकांकडे जमा झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील दोन्ही यादीत २१ हजार १२४ खातेदारांच्या नावावर ७८ कोटी ७१ लाख रुपये आले; पण त्यातील १७ हजार ८५४ खात्यांवर ७० कोटी ९४ लाखाचा जमा-खर्च आतापर्यंत पूर्ण झाला आहे.

सातारामध्येही १८ हजार ५०२ खात्यांचे ८६ कोटी ५६ लाख ५१ हजार रुपये रक्कम आली. त्यापैकी १५ हजार २६४ खात्यांचे ७२ कोटी २८ लाखाचा जमाखर्च खाला आहे. कोल्हापूर मध्ये मात्र परिस्थिती वेगळी असून राज्यात सर्वांत संथगतीने काम येथे सुरू असल्याने केवळ १७०० खातेदारांचे ७ कोटी १ लाख रुपये दोन्ही यादीतून आले आहे. त्यापैकी १५७७ खात्यांचा साडेसहा कोटींचा जमा-खर्च पूर्ण झाला आहे.

विभागातील ३६०२ विकास संस्थांच्या माध्यमातून ६ लाख ६२ हजार २७१ खातेदारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३४ हजार ६९५ खातेदारांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. एकूण अर्जांच्या केवळ ५ टक्के खातेदारांना आतापर्यंत लाभ मिळाल्याने उर्वरित खातेदारांना लाभ कधी मिळणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे.

अपात्र कर्जमाफीचा धसका!केंद्र सरकारने सन २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीमध्ये सर्वाधिक ४४ हजार शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांचे माफ केलेले ११२ कोटी ‘नाबार्ड’ने वसूल केले. त्याचा धसका सहकार विभागाने घेतल्याने कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून चाळण लावल्यानेच कर्जमाफीत कोल्हापूर मागे राहिला आहे.

अशी आहे कर्जमाफीची परिस्थिती :जिल्हा          कर्जमाफीचे एकूण प्रस्ताव                  आतापर्यंत मंजूर जमा            खर्च झालेली रक्कमसांगली                १ लाख ७० हजार ७६६                      १७ हजार ८५४                         ७० कोटी ९४ लाख ९५ हजारसातारा                २ लाख ४० हजार ७४७                       १५ हजार २६४                       ७२ कोटी २८ लाख ७८ हजारकोल्हापूर             २ लाख ५० हजार ७५८                      १ हजार ५७७                          ६ कोटी ५० लाख १४ हजार

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर