शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
3
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
4
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
5
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
6
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
7
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
8
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
9
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
10
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
11
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
12
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
13
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
14
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
15
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
16
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
17
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
18
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
19
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विभागातील ३४ हजार शेतकऱ्यांना दीडशे कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 13:28 IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या खातेदारांच्या संख्येत सांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देएकूण अर्जदारांच्या ५ टक्केच खातेदारांना लाभसांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र अपात्र कर्जमाफीचा धसका!

राजाराम लोेंढे

 कोल्हापूर : राज्य सरकारच्या कर्जमाफीचा कोल्हापूर विभागातील ३४ हजार ६९५ खातेदारांना आतापर्यंत लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर दीडशे कोटींची रक्कम वर्ग झाली आहे. विभागातून ६ लाख ६२ हजार खातेदारांनी कर्जमाफीसाठी प्रस्ताव दाखल केले असून आतापर्यंत केवळ ५ टक्केच लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या खातेदारांच्या संख्येत सांगली जिल्हा आघाडीवर असला तरी कोल्हापूर मात्र राज्यात मागे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

जून महिन्यात राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, पण आॅनलाईन अर्ज दाखल करण्यापासून कर्जमाफी योजना वादाच्या भोवऱ्यात आडकली आहे. कर्जमाफीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी सरकारने अनेक तारखा सांगितल्या, पण अद्याप सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालेलाच नाही.

आतापर्यंत दोन ग्रीन याद्यांच्या माध्यमातून खातेदारांची नावे व त्यांच्या रकमा बँकांकडे जमा झाल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील दोन्ही यादीत २१ हजार १२४ खातेदारांच्या नावावर ७८ कोटी ७१ लाख रुपये आले; पण त्यातील १७ हजार ८५४ खात्यांवर ७० कोटी ९४ लाखाचा जमा-खर्च आतापर्यंत पूर्ण झाला आहे.

सातारामध्येही १८ हजार ५०२ खात्यांचे ८६ कोटी ५६ लाख ५१ हजार रुपये रक्कम आली. त्यापैकी १५ हजार २६४ खात्यांचे ७२ कोटी २८ लाखाचा जमाखर्च खाला आहे. कोल्हापूर मध्ये मात्र परिस्थिती वेगळी असून राज्यात सर्वांत संथगतीने काम येथे सुरू असल्याने केवळ १७०० खातेदारांचे ७ कोटी १ लाख रुपये दोन्ही यादीतून आले आहे. त्यापैकी १५७७ खात्यांचा साडेसहा कोटींचा जमा-खर्च पूर्ण झाला आहे.

विभागातील ३६०२ विकास संस्थांच्या माध्यमातून ६ लाख ६२ हजार २७१ खातेदारांनी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी आतापर्यंत ३४ हजार ६९५ खातेदारांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. एकूण अर्जांच्या केवळ ५ टक्के खातेदारांना आतापर्यंत लाभ मिळाल्याने उर्वरित खातेदारांना लाभ कधी मिळणार याबाबत कमालीची संभ्रमावस्था पसरली आहे.

अपात्र कर्जमाफीचा धसका!केंद्र सरकारने सन २००८ मध्ये केलेल्या कर्जमाफीमध्ये सर्वाधिक ४४ हजार शेतकरी अपात्र ठरले होते. त्यांचे माफ केलेले ११२ कोटी ‘नाबार्ड’ने वसूल केले. त्याचा धसका सहकार विभागाने घेतल्याने कोणत्याही त्रुटी राहू नयेत, म्हणून चाळण लावल्यानेच कर्जमाफीत कोल्हापूर मागे राहिला आहे.

अशी आहे कर्जमाफीची परिस्थिती :जिल्हा          कर्जमाफीचे एकूण प्रस्ताव                  आतापर्यंत मंजूर जमा            खर्च झालेली रक्कमसांगली                १ लाख ७० हजार ७६६                      १७ हजार ८५४                         ७० कोटी ९४ लाख ९५ हजारसातारा                २ लाख ४० हजार ७४७                       १५ हजार २६४                       ७२ कोटी २८ लाख ७८ हजारकोल्हापूर             २ लाख ५० हजार ७५८                      १ हजार ५७७                          ६ कोटी ५० लाख १४ हजार

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर