शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

Kolhapur Crime: अपहरण करून चिमुरड्या वरदचा खून, आरोपीस आजन्म कारावास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 17:31 IST

अनिल पाटील मुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी ...

अनिल पाटीलमुरगूड : सोनाळी ता.कागल येथील वरद रवींद्र पाटील (वय ७) या बालकाचा अपहरण करुन खून केल्या प्रकरणी अटकेत असणारा संशयित आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५ रा सोनाळी ता.कागल) याला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. आज, मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश के. बी. अग्रवाल यांनी ही शिक्षा ठोठावली.१७ ऑगस्ट २०२१ रोजी वरद खून प्रकरण चांगलेच गाजले होते. आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी वरदच्या कुटुंबियांनी आणि सोनाळी व सावर्डे ग्रामस्थांनी विविध मोर्चे आंदोलने केली होती. मुरगूड पोलिसांनी हे प्रकरण संवेदनशील पणे हाताळून आरोपीला तात्काळ अटक केली होती. वरदच्या कुटुंबीयांनी मात्र आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी उचलून धरली होती.अधिक माहिती अशी, सोनाळी येथील वरद पाटील हा आजोबा दत्तात्रय शंकर म्हातूगडे यांच्या घरी वास्तूशांती समारंभासाठी गेला होता. दरम्यान १७ ऑगस्ट २०२१रोजी रात्री आठ पासून तो बेपत्ता होता. रात्रभर घरच्यांनी त्याचा शोध घेतला पण त्याचा शोध न लागल्याने अखेर मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये अपहरणाची तक्रार दिली. मुरगूड पोलिसांनी दोन दिवसांमध्ये तपासाची चक्रे वेगाने फिरवून काही तासात संशयित म्हणून दत्तात्रय उर्फ मारुती वैद्य याला ताब्यात घेतले होते. वैद्य हा वास्तूशांती समारंभासाठी सावर्डे या गावी गेला होता.त्याला सावर्डे मधील काहींनी वरद बरोबर पाहिले होते. त्यामुळे मुरगूड पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच आपण वरदचे अपहरण केले असून त्याचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. या गुन्ह्याचा तपास मुरगूडचे तत्कालीन सहा पोलीस निरीक्षक विकास बडवे, सहा पोलीस उप निरीक्षक किशोरकुमार खाडे, सहा पोलीस उप निरीक्षक कुमार ढेरे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. सरकारतर्फे या खटल्यात प्रधान जिल्हा सरकार वकील विवेक शुक्ल , विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी काम पाहिले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय