शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

किमान जे आहे ते काम तरी नीट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST

कोल्हापूर : निवृत्त झाल्यानंतर सहा महिने उलटले, तरी पेन्शनचे काम होत नाही. संस्थाचालक, मुख्याध्यापकांकडून अचानक वेतन थांबविले जाते, अशा ...

कोल्हापूर : निवृत्त झाल्यानंतर सहा महिने उलटले, तरी पेन्शनचे काम होत नाही. संस्थाचालक, मुख्याध्यापकांकडून अचानक वेतन थांबविले जाते, अशा स्वरूपातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे छोटे-छोटे अनेक प्रश्न मंत्रालयापर्यंत येतात. ते स्थानिक पातळीवर सोडविण्यात यावेत. या स्वरूपातील तक्रारींचे प्रमाण कमी व्हावे. विशेष काम नाही, पण किमान जे आहे ते काम तरी नीट करा, अशी सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी येथे शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केली.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री गायकवाड यांनी शासकीय विश्रामगृहात कोल्हापुरातील शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार प्रमुख उपस्थित होते. शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न असून त्यांची मला कल्पना आहे. ते सोडविले जातील. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात तडजोड चालणार नाही, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

अमन मित्तल यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची माहिती दिली. ‘सीएसआर‘ फंडासाठी स्वतंत्र खाते उघडण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

किरण लोहार यांनी माध्यमिक शिक्षण विभागाची कामगिरी, उपक्रमांची माहिती दिली. ‘डाएट’चे प्राचार्य आय. सी. शेख यांनी थकीत वेतनाचा, तर शिक्षण सहसंचालक सुभाष चौगुले यांनी संचमान्यतेचा मुद्दा मांडला.

यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, महापालिकेच्या शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव, भरत रसाळे आदी उपस्थित होते.

चौकट

कमी पटसंख्येबद्दल नाराजी

जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमधील पटसंख्या कमी होत असून ती शाळा टिकली पाहिजे, अशी मागणी आमदार आसगावकर यांनी केली. विद्यार्थ्यांना पोषण आहार, पुस्तके, गणवेश आदी आपण देतो, तरीही पटसंख्या कमी का? अशी विचारणा करत मंत्री गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. या शाळेसाठी गणितासह काही विषयांचे शिक्षक कमी असल्याचे मित्तल यांनी सांगितले. त्यावर या शाळेतील पटसंख्या वाढीवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना मंत्री गायकवाड यांनी मित्तल यांना केली.