शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘डीपीसी’ची वारी, नेत्यांची डोकेदुखी, १९ जागांसाठी महायुतीत सुरु साठमारी

By समीर देशपांडे | Updated: June 20, 2025 16:38 IST

कार्यकर्त्यांची निवड करताना नेत्यांची लागणार कसोटी

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने उलटून गेले. तरी सत्तेचे फायदे थेट कार्यकर्त्यांपर्यंत झिरपताना दिसत नाहीत. आता जिल्हा नियोजन समितीवर घ्यावयाच्या १९ विशेष निमंत्रितांच्या माध्यमातून बलदंड आणि आपल्याशी प्रामाणिक कार्यकर्त्याला बळ देण्याची संधी नेत्यांना आली आहे. परंतु, हीच त्यांची डोकेदुखी ठरली असून, यासाठी ‘महायुती’मध्येच साठमारी होणार आहे.जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी प्रकाश आबिटकर यांची नियुक्ती झाली. परंतु, अजूनही नियोजन समितीवर विशेष निमंत्रितांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ज्यांच्या नियुक्त्या झाल्या, त्यांना पहिल्या बैठकीलाही उपस्थित राहता आले नाही. मात्र, आता जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुकीच्या आधी या नियुक्त्या करून या निवडणुकांतील उमेदवारीची स्पर्धा कमी करण्याचा नेत्यांचा प्रयत्न असल्याचे समजते. यावर गेल्या आठवड्यात झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.१९ जागांपैकी १० आमदारांनी प्रत्येकी एक सदस्य सुचवण्याचा पर्याय पुढे आला आहे. उर्वरित ९ जागांसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच होणार आहे. यातील दोन जागांमधील प्रत्येकी एका जागेसाठी महायुतीचे दोन खासदार आग्रही असतील. उर्वरित ७ जागांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनुसराज्यचे नेते आग्रही असतील, तर नियोजन समिती डोळ्यासमोर ठेवूनच आरपीआय आठवले गटाने आतापासूनच वातावरण तापवायला सुरुवात केली आहे.

नव्या प्रवेशकर्त्यांना बक्षीस की जुन्यांना संधीमहापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये सत्ता मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे नव्याने पक्षात येणाऱ्या बलवान नेते, कार्यकर्त्यांना या पदाची बक्षिसी दिली जाणार का जुन्या कार्यकर्त्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाणार हे नावे निश्चित झाल्यानंतरच समजणार आहे.

अंतिम फॉर्म्युला नाहीया पदांसाठी मोठी चुरस असल्याने याचा निर्णय तातडीने घेण्यात आलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद स्वीकारल्यानंतर तातडीने नावे निश्चित केली होती. परंतु, कोल्हापूरमध्ये सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यास विलंब झाला आहे. जोपर्यंत या पदवाटपाचा पक्षनिहाय फॉर्म्युला ठरत नाही आणि त्याला वरिष्ठ नेत्यांची मान्यता मिळत नाही, तोपर्यंत हा निर्णय वास्तवात येणार नाही.