शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्यातील नेत्यांनी मैत्री शिकावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:20 IST

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी ...

कोल्हापूर : निवडणुकीच्या कालावधीत एकमेकाला कितीही शिव्या घालाव्यात; पण त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून चहा पिण्यासाठी एकत्र आले पाहिजे. जिल्ह्यातील राजकारण्यांनी दोस्ती शिकली पाहिजे, असा सल्ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. ‘एम. आय. आर. डी.’ संस्थेने जिल्ह्यातील सामाजिक संस्थांचे पालकत्व स्वीकारून काम करावे, लागेल ती मदत देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.महाराष्टÑ इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अ‍ॅँड डेव्हलपमेंट या संस्थेच्या इमारतीचे रविवारी झालेले उद्घाटन व सी. ए. शरद सामंत शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. इमारतीच्या भूमिपूजनवेळचे कर्मचारी लिंगाप्पा भागोजी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तर मंत्री पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले.मंत्री पाटील म्हणाले, समाजात अनेक संस्था अडचणीतून मार्गक्रमण करत असताना सूर गवसण्यास खूप कालावधी जातो. सामाजिक संस्थांसाठी ‘एमआयआरडी’ने संशोधन करून कशाची गरज आहे, हे शोधून काढा. यासाठी वयोवृद्ध लोकांची नेमणूक करून त्यांचा डाटा तयार करा. सरकार सक्षम आहे, पण सतेज पाटील तसे म्हणणार नाहीत, ते त्यांचे कामच आहे. पण तुमचेच सरकार येणार, असे त्यांनी आपल्या कानात सांगितले, असा चिमटाही त्यांनी काढला.आमदार सतेज पाटील म्हणाले, शरद सामंत यांनी ‘एमआयआरडी’ संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठे काम उभे केले. संशोधनासाठी विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागते, कोल्हापूरच्या स्तरावर संशोधनासाठी यायचे झाले तर ते ‘एमआयआरडी’ मध्येच यायला पाहिजे.संस्थेचे संस्थापक शरद सामंत म्हणाले, अनेक अडथळे पार करत इमारतीचे बांधकाम शासनाने दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण केले; पण सामाजिक काम करणाऱ्यांना धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून वाईट वागणूक मिळते अशी तक्रार मंत्री पाटील यांच्याकडे केली. गिरीष सामंत यांनी स्वागत केले. ‘सायबर’, ‘बालकल्याण’, ‘अवनि’, ‘हेल्पर्स आॅफ हॅँडीकॅप्ड’ या संस्थेस दोन लाख रुपयांची मदत दिली. आमदार सुजित मिणचेकर, संजय पवार, नगरसेवक अर्जुन माने, अजित तारळेकर, संजय व्हनबट्टे, अवधूत झारापकर, पी. डी. देशपांडे, संजय परुळेकर, आदी उपस्थित होते.दुष्काळासाठी स्टँपचा महसूल पुरेसासतेज पाटील यांचे टीका करण्याचे कामच आहे; पण सरकारची निधी देण्यासाठी खूप क्षमता आहे. जीएसटीच्या माध्यमातून उत्पन्न वाढले असून एकट्या स्टॅँपमधून २९ हजार कोटींचे उत्पन्न मिळाले. दुष्काळ निवारण्यासाठी केवळ स्टॅँपचा महसूल पुरेसा असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.दादा, ‘ते’‘ध्यानात ठेवलंय’संघटनेत आता पूर्ण वेळ काम करायचं, हे आमचं ठरलंय. दादा, आता बंटींबद्दल तुम्ही ठरवा असे सांगत, वैयक्तिक काम घेऊन आपल्याकडे यायचे नाही, हे दादांनी सांगितले आहे. पण ‘दादा, आम्ही ते ध्यानात ठेवलंय’, अशी पुष्टी शरद सामंत यांनी जोडल्याने एकच हंशा पिकला.‘सतेज’ यांचं पुढचं काय ठरलंयव्यासपीठावरील उपस्थितांची नावे घेतानाच मंत्री पाटील यांनी ज्यांची ‘आमचं ठरलंय’ ही टॅग लाईन सूचक बोलण्यासाठी वापरली जाते, त्यांचं पुढचं काय ठरलंय हे माहिती नाही, ते आमचे परममित्र सतेज पाटील, असा उल्लेख केला. ‘सतेज’ मंत्री नसले म्हणून ते मदत करण्यास मागे राहणार नाहीत, त्यांच्याकडे क्षमता आहे. परमेश्वर त्यांच्यावर प्रसन्न असल्याने त्यांना राजकारणातूनच गोळा करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.