शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

एमआयडीसींसाठी भूसंपादन हेच आव्हान, कोल्हापूर जिल्ह्यात चार नव्या एमआयडीसींची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 15:51 IST

शेतजमीन गेल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न होतो गंभीर

कोल्हापूर : जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्ह्यात चार नव्या एमआयडीसींची घोषणा झाली खरी मात्र, आता भूसंपादनाचे आव्हान औद्योगिक विकास महामंडळासमोर उभे ठाकले आहे. विकासवाडी, कौलवमध्ये थेट विरोध झाल्याने या एमआयडीसींची प्रक्रिया थंडावली असली तरी आवळी एमआयडीसीसाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आता आवळीकरांनीही विरोधाची धार तीव्र केल्याने नवे संकट निर्माण झाले आहे.मुळातच कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी जमीनधारणा कमी आहे. त्यात रस्ते, पाटबंधारे प्रकल्प यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. लोकसंख्या वाढली, कुटुंबे विभक्त झाली तसे जमिनीचे तुकडे पडले आहेत. त्यामुळे जी कुठे शिल्लक जमीन आहे तीदेखील काढून घेतली तरी जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. औद्योगिक वसाहत होते. परंतु तिथे लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ ज्यांची जमीन गेली आहे, त्यांच्यातून उपलब्ध होत नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी हक्काचे साधन असलेली शेतजमीन काढून घेऊ नये, यासाठी लोक रस्त्यावर येऊ लागले आहेत.आवळी (ता. पन्हाळा) येथे २०२३ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एमआयडीसीची घोषणा केली होती. तब्बल २५२ हेक्टर क्षेत्रावर ही एमआयडीसी उभी राहत असून, याची अधिसूचनाही प्रसिद्ध केली आहे. येत्या वर्षभरात पूर्ण भूसंपादन करण्याचे नियोजन औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालयाने सुरू केले आहे. याच एमआयडीसीजवळून रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग जात असल्याने उद्योगांमधील उत्पादनाची वाहतूक सुलभ होणार आहे.मात्र, या प्रस्तावित एमआयडीसीला आवळी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. आधीच रत्नागिरी-नागपूर महामार्गाने आम्ही बाधित झालो आहोत. त्यात आमच्या जमिनी गेल्याने अल्पभूधारकांचे जिणे आमच्या वाट्याला आले आहे. आता परत एमआयडीसीसाठी जमिनी घेतल्या तर आम्ही जायचे कुठे, असा सवाल आवळीकर करत आहेत.

आवळीकरांचा ग्रामसभेत ठरावआवळी येथील एमआयडीसीला विरोध करणारा ठराव आवळी ग्रामस्थांनी २६ जानेवारी २०२४ रोजी केला होता. ही एमआयडीसी करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत आवळी गाव यातून वगळावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. या एमआयडीसीसाठीची सर्व प्रक्रिया शासनस्तरावून पार पाडण्यात आली आहे. आता भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली जात असतानाच ग्रामस्थांनी विरोध सुरू केल्याने नवे संकट उभे राहिले आहे.

आवळी गावची शेतीवर उपजीविका असून, आधीच रत्नागिरी-नागपूर महामार्गात गावची जमिनी मोठ्या प्रमाणात गेली आहे. आता एमआयडीसीसाठी जवळपास साडेसातशे एकर जमीन जाणार आहे. असे झाल्यास पूर्ण गाव भूमिहीन होईल. त्यामुळे गावाने जायचे कुठे, हा प्रश्न आहे. त्यामुळे या एमआयडीसीला आमचा विरोध आहे. यात सामाजिक वनीकरणाचीही जमीन जाणार आहे. यामुळे या परिसरातील पशुपक्ष्यांचा अधिवास धोक्यात येणार आहे. -मच्छिंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते, आवळी 

महामार्गासाठी जमीन गेल्याने आवळी ग्रामस्थ अल्पभूधारक झाले आहेत. एमआयडीसीसाठी जमीन गेली तर शेतकऱ्यांनी कशी उपजीविका करायची. या एमआयडीसीमुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येणार आहे. त्यामुळे आमचा या एमआयडीसीला विराेध आहे. -सुरेश कदम, माजी सरपंच, आवळी

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी