शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:51 IST

सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या,

ठळक मुद्दे सोलापूर ते रत्नागिरी नवा मार्ग : दीड वर्ष उलटले; राजमार्ग प्राधिकरणाची कासवगतीने प्रक्रिया; ४९ गावांचा समावेश

तानाजी पोवार ।कोल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या, फेरसुनावण्या याच गर्तेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने वर्षअखेरपर्यंतही हे भूसंपादन पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.नागपूर, सोलापूर, कोल्हापूर ते रत्नागिरी असा हा नवा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर अशा सुमारे ३७० किलोमीटर मार्गासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

गेल्या दहा ते बारा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या नव्या मार्गाची गरज भासू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी या चार तालुक्यांतील सुमारे ४९ गावांतून हा मार्ग जातो.या संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे. मार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्णातील भूसंपादन प्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अधिसूचना काढली.त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली; पण प्रारंभीच मार्गावरील मोजणी, क्षेत्र निश्चितीला विलंब झाला. राष्टÑीमहामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील प्रक्रिया ही कासवगतीने सुरू आहे. खरे तर मार्च २०१८ मध्ये हे भूसंपादन सुरू होणे आवश्यक होते; पण त्यानंतर फक्त प्रक्रिया सुरू असून अद्याप इंचभरही भूसंपादन झालेले नाही. शासनाकडून प्रक्रियेस विलंब होऊ लागल्याने पुढील भूसंपादनाची प्रक्रियाही हळूहळ ू रखडू लागली आहे. सुमारे दीड वर्ष झाले तरीही अद्याप इंचभरही भूसंपादन करण्यात यश मिळालेले नाही. विशेषत: करवीर तालुक्यातील सर्व गावांनी या नव्या मार्गासाठी विरोध दर्शविला आहे.कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाºया मार्गावरील गावांचा समावेशआंबा, वासल, गोळसवडे, जाधववाडी, चांदोली, तोफेश्वर, हणबरवाडी, भैरेवाडी, भाडळे, मलकापूर, शाहूवाडी, करंजोशी, ठमकेवाडी, गोगवे, बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी, आवळी, नावली, बोरपाडळे, भांबरवाडी, पैजारवाडी, केर्ले, रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक.प्रत्यक्षात क्षेत्र वाढले

प्रारंभी भूसंपादनाच्या नोटिसीवेळी क्षेत्र निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्ष मोजणीनंतर क्षेत्र आणखी वाढल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे पुन्हा शेतकºयांना नोटिसा काढल्या व पुन्हा सुनावण्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.नवीन बायपास मार्ग

केर्ले (शहीद जवान मच्छिंद्र देसाई पेट्रोल पंपानजीक)पासून नवा बायपास महामार्ग आखला असून तो रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक असा पुढे कोल्हापूर ते सांगली मार्गाला मिळणार आहे.शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगलेतील सुमारे ५१२ शेतकºयांना भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत भारतीय राज प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून, काहींच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. 

कोल्हापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असली तरीही सध्या तक्रारदार शेतकºयांच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूधारक शेतकºयांना शासनामार्फत मोबदला दिल्यानंतर भूसंपादन करण्यात येणार आहे.- बी. एस. साळुंखे,  प्रकल्प संचालक, भारतीय राजमार्ग प्राधिकरण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग