शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

फेरसुनावणीत अडकले चौपदरीकरणाचे भूसंपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:51 IST

सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या,

ठळक मुद्दे सोलापूर ते रत्नागिरी नवा मार्ग : दीड वर्ष उलटले; राजमार्ग प्राधिकरणाची कासवगतीने प्रक्रिया; ४९ गावांचा समावेश

तानाजी पोवार ।कोल्हापूर : सोलापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गांतर्गत कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाऱ्या १३७ कि. मी. लांब मार्गात ४९ गावांचा समावेश आहे; पण या मार्गासाठी सुमारे दीड वर्षानंतर इंचभरही भूसंपादन करण्यात भारतीय राजमार्ग प्राधिकरणास यश आलेले नाही. फक्त नोटिसा, सुनावण्या, फेरसुनावण्या याच गर्तेत प्रशासकीय यंत्रणा अडकल्याने वर्षअखेरपर्यंतही हे भूसंपादन पूर्ण होण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.नागपूर, सोलापूर, कोल्हापूर ते रत्नागिरी असा हा नवा राष्टÑीय महामार्ग क्र. १६६ आहे. रत्नागिरी ते कोल्हापूर, मिरज, सांगोला ते सोलापूर अशा सुमारे ३७० किलोमीटर मार्गासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

गेल्या दहा ते बारा वर्षांत कोकणाशी दळणवळण वाढल्याने या नव्या मार्गाची गरज भासू लागली आहे. कोल्हापूर जिल्ह्णातील हातकणंगले, करवीर, पन्हाळा आणि शाहूवाडी या चार तालुक्यांतील सुमारे ४९ गावांतून हा मार्ग जातो.या संपूर्ण मार्गाचे चौपदरीकरण व काँक्रीटीकरण होणार आहे. मार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्णातील भूसंपादन प्रक्रियेसाठी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी अधिसूचना काढली.त्यानंतर प्रक्रिया सुरू झाली; पण प्रारंभीच मार्गावरील मोजणी, क्षेत्र निश्चितीला विलंब झाला. राष्टÑीमहामार्गाची आखणी पूर्ण झाली असताना भूसंपादनासाठी काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील प्रक्रिया ही कासवगतीने सुरू आहे. खरे तर मार्च २०१८ मध्ये हे भूसंपादन सुरू होणे आवश्यक होते; पण त्यानंतर फक्त प्रक्रिया सुरू असून अद्याप इंचभरही भूसंपादन झालेले नाही. शासनाकडून प्रक्रियेस विलंब होऊ लागल्याने पुढील भूसंपादनाची प्रक्रियाही हळूहळ ू रखडू लागली आहे. सुमारे दीड वर्ष झाले तरीही अद्याप इंचभरही भूसंपादन करण्यात यश मिळालेले नाही. विशेषत: करवीर तालुक्यातील सर्व गावांनी या नव्या मार्गासाठी विरोध दर्शविला आहे.कोल्हापूर जिल्ह्णातून जाणाºया मार्गावरील गावांचा समावेशआंबा, वासल, गोळसवडे, जाधववाडी, चांदोली, तोफेश्वर, हणबरवाडी, भैरेवाडी, भाडळे, मलकापूर, शाहूवाडी, करंजोशी, ठमकेवाडी, गोगवे, बांबवडे, डोणोली, खुटाळवाडी, आवळी, नावली, बोरपाडळे, भांबरवाडी, पैजारवाडी, केर्ले, रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक.प्रत्यक्षात क्षेत्र वाढले

प्रारंभी भूसंपादनाच्या नोटिसीवेळी क्षेत्र निश्चित करण्यात आले होते; पण प्रत्यक्ष मोजणीनंतर क्षेत्र आणखी वाढल्याचे निदर्शनास आले; त्यामुळे पुन्हा शेतकºयांना नोटिसा काढल्या व पुन्हा सुनावण्या घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे.नवीन बायपास मार्ग

केर्ले (शहीद जवान मच्छिंद्र देसाई पेट्रोल पंपानजीक)पासून नवा बायपास महामार्ग आखला असून तो रजपूतवाडी, कुशिरे, निगवे, भुयेवाडी, भुये, शिये, नंदगाव, हालोंडी, हेर्ले, चोकाक असा पुढे कोल्हापूर ते सांगली मार्गाला मिळणार आहे.शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगलेतील सुमारे ५१२ शेतकºयांना भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत भारतीय राज प्राधिकरणामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. त्या सुनावण्या पूर्ण झाल्या असून, काहींच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. 

कोल्हापूर ते रत्नागिरी या नव्या राष्टÑीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असली तरीही सध्या तक्रारदार शेतकºयांच्या फेरसुनावण्या सुरू आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भूधारक शेतकºयांना शासनामार्फत मोबदला दिल्यानंतर भूसंपादन करण्यात येणार आहे.- बी. एस. साळुंखे,  प्रकल्प संचालक, भारतीय राजमार्ग प्राधिकरण

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग