शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग 

By राजाराम लोंढे | Updated: July 18, 2023 12:16 IST

या पिकांना मिळणार लाभ

राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी सरकारने एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कोकण व कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. कोकण विभागात केवळ १८ हजार ७०६, तर कोल्हापूर विभागात ६२ हजार ७२६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९ लाख ८४ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत.निसर्ग लहरी बनल्याने शेती बेभरवसाची झाली आहे. मान्सून वेळेत सुरू होत नाही आणि नेमके काढणीच्या वेळी पाऊस असल्याने पिकांचे नुकसान होते. यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. मागील हंगामापर्यंत विमा हप्त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यावर्षीपासून एक रुपयात विमा योजना सुरू केल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी या योजनेत सहभागी होतील, असा कृषी विभागाचा अंंदाज आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत राज्यातील आठ कृषी विभागांत ६६ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी ९६ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्या तुलनेत ६८ टक्केच सहभाग दिसत आहे. विमा उतरवण्यात कोकण व कोल्हापूर विभागात उदासीनता दिसते.

पीकविम्याचा बीड पॅटर्नबीड जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सर्वाधिक शेतकरी पीकविमा काढतात. येथे पाऊस कमी असल्याने पिकांची जोखीम अधिक असते. ११० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तर निकषानुसार विमा कंपनी भरपाई देते आणि त्यावरील सरकार भरपाई देत असल्याने येथील शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसते.

या पिकांना मिळणार लाभ

खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे.भाताबाबत निकष बदलण्याची गरजभात हे जलप्रिय पीक असल्याने ते सात-आठ दिवस पाण्याखाली राहिले तरी त्याचे नुकसान होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भाताला काढणीनंतर सुखवताना काही नुकसान झाले तरच विम्यातून भरपाई मिळू शकते, हा निकष लावला आहे. हा निकष बदलण्याची गरज आहे.

पीकविमा भरणारे पहिले दहा जिल्हेबीड - ९,८४,७८६नांदेड - ७,१५,९३८छ. संभाजीनगर - ६,०८,५६९जालना - ५,६५,४००परभणी - ४,३७,,५२०लातूर - ४,१७,७६५यवतमाळ - ४,०३,४९०उस्मानाबाद - ३,७६,९२५बुलढाणा - ३,४०,३७८अहमदनगर - २,२८,४२९

कमी सहभाग असलेले शेतकरी -रत्नागिरी -३८८सिंधुदुर्ग - ८२१रायगड - २३८३कोल्हापूर - २४९३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीBeedबीड