शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पीकविम्यात कोकण, कोल्हापूर विभाग उदासीन, बीडमध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांचा सहभाग 

By राजाराम लोंढे | Updated: July 18, 2023 12:16 IST

या पिकांना मिळणार लाभ

राजाराम लोंढेकोल्हापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी सरकारने एक रुपयात विमा उपलब्ध करून दिला आहे. मात्र, कोकण व कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. कोकण विभागात केवळ १८ हजार ७०६, तर कोल्हापूर विभागात ६२ हजार ७२६ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. राज्यात सर्वाधिक बीड जिल्ह्यातील ९ लाख ८४ हजार शेतकरी योजनेत सहभागी झाले आहेत.निसर्ग लहरी बनल्याने शेती बेभरवसाची झाली आहे. मान्सून वेळेत सुरू होत नाही आणि नेमके काढणीच्या वेळी पाऊस असल्याने पिकांचे नुकसान होते. यासाठी सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजना सुरू केली आहे. मागील हंगामापर्यंत विमा हप्त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागत होती. मात्र, यावर्षीपासून एक रुपयात विमा योजना सुरू केल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी या योजनेत सहभागी होतील, असा कृषी विभागाचा अंंदाज आहे.या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम मुदत आहे. आतापर्यंत राज्यातील आठ कृषी विभागांत ६६ लाख ११ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी ९६ लाख ६२ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला होता. त्या तुलनेत ६८ टक्केच सहभाग दिसत आहे. विमा उतरवण्यात कोकण व कोल्हापूर विभागात उदासीनता दिसते.

पीकविम्याचा बीड पॅटर्नबीड जिल्ह्यात प्रत्येक वर्षी सर्वाधिक शेतकरी पीकविमा काढतात. येथे पाऊस कमी असल्याने पिकांची जोखीम अधिक असते. ११० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तर निकषानुसार विमा कंपनी भरपाई देते आणि त्यावरील सरकार भरपाई देत असल्याने येथील शेतकऱ्यांची संख्या अधिक दिसते.

या पिकांना मिळणार लाभ

खरीप हंगामातील भात (धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण लागू आहे.भाताबाबत निकष बदलण्याची गरजभात हे जलप्रिय पीक असल्याने ते सात-आठ दिवस पाण्याखाली राहिले तरी त्याचे नुकसान होत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने भाताला काढणीनंतर सुखवताना काही नुकसान झाले तरच विम्यातून भरपाई मिळू शकते, हा निकष लावला आहे. हा निकष बदलण्याची गरज आहे.

पीकविमा भरणारे पहिले दहा जिल्हेबीड - ९,८४,७८६नांदेड - ७,१५,९३८छ. संभाजीनगर - ६,०८,५६९जालना - ५,६५,४००परभणी - ४,३७,,५२०लातूर - ४,१७,७६५यवतमाळ - ४,०३,४९०उस्मानाबाद - ३,७६,९२५बुलढाणा - ३,४०,३७८अहमदनगर - २,२८,४२९

कमी सहभाग असलेले शेतकरी -रत्नागिरी -३८८सिंधुदुर्ग - ८२१रायगड - २३८३कोल्हापूर - २४९३

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरीBeedबीड