शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

कोल्हापूर : ‘त्या’ दोघा समाजकंटकाना तडीपार करणार : सुरज गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 7:10 PM

गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.

ठळक मुद्दे‘त्या’ दोघा समाजकंटकाना तडीपार करणार : सुरज गुरवजातीय तेड निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार : शांतता बैठकीत इशारा

कोल्हापूर : गिरगाव (ता. करवीर) येथील दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मॅसेज वॉटस्अ‍ॅपवरून प्रसारित करणारे समाजकंठक संशयित संग्राम भिकाजी कांबळे (वय १९), अरुण अशोक पाटील (२०, दोघे रा. गिरगाव) या दोघांना जिल्ह्यातून तडीपार करणार आहे.

यापुढे जातीय तेड निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशारा करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी मंगळवारी दिला. घटनेच्या पार्श्वभूमिवर दोन्ही समाजातील लोकांची गांधीनगर पोलीस ठाण्यात शांतता बैठकीचे आयोजन केले होते.गिरगाव येथील आकाश संजय खेडकर या तरुणाच्या मोबाईलवर आक्षेपार्ह मजकूर पाठविल्याने गावात दोन्ही समाजामध्ये तणाव पसरला. याप्रकरणी इस्पूर्ली पोलिसांनी दलित समाजाच्या संग्राम कांबळे याला अटक केली. त्यानंतर सवर्ण समाजाच्या अरुण पाटील याला अटक केली. या अटक सत्रावरुन दोन्ही समाजातील लोक घराबाहेर पडत मुख्य चौकात जमा झालेने तणाव पसरला होता.

पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव हे फौजफाट्यासह गावात दाखल झाल्याने तणाव निवाळला. पुन्हा दोन्ही समाजामध्ये वादविवाद होवू नये, यासाठी समाजातील काही प्रमुख व्यक्तिंची मंगळवारी दूपारी गांधीनगर पोलीस ठाण्यात बैठक आयोजित केली होती. यावेळी पोलीस उपअधीक्षक गुरव यांनी दोन्ही समाजातील लोकांची समजूत घालत शांततेचे आवाहन केले.

कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करु नये, तरुणपिढीचे शैक्षणिक नुकसान होईल. शांतता प्रस्थापीत करण्यासाठी सर्वांनी ऐकोप्याने रहावे. यावेळी गुन्हे मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर गुरव यांनी गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.

समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार आहे. अटक केलेल्या दोन्ही समाजकंटकांना जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे. यापुढे कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी दोन्ही समाजाने घ्यावी, अशा सुचना केल्या. बैठकीस दोन्ही समाजातील लोक उपस्थित होते.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिस