शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
3
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
4
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
5
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
6
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
7
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
8
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
9
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
10
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
11
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
12
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
13
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
14
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
15
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
16
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
17
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
18
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
19
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
20
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?

कोल्हापूर पुन्हा होईल चित्रपटनिर्मितीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 12:38 IST

कोल्हापूर चित्रनगरी आता लोकेशन्सने सुसज्ज आहे. पुढील काळात अत्याधुनिक स्टुडिओ, नावीन्यपूर्ण सेट येथे उभारणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नैसर्गिक लोकेशन्सवर मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. येथील निसर्ग, कलाकार, तंत्रज्ञ, या क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्ती या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आणि येथे चित्रीकरणासाठी निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला, तर कोल्हापूर पुन्हा चित्रपटनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास सिनेसृष्टीतील मान्यवरांनी  व्यक्त केला.

ठळक मुद्देकोल्हापूर पुन्हा होईल चित्रपटनिर्मितीचे केंद्रचर्चासत्रात मान्यवरांचा विश्वास : गरज पुढाकाराची

कोल्हापूर : कोल्हापूर चित्रनगरी आता लोकेशन्सने सुसज्ज आहे. पुढील काळात अत्याधुनिक स्टुडिओ, नावीन्यपूर्ण सेट येथे उभारणार आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नैसर्गिक लोकेशन्सवर मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. येथील निसर्ग, कलाकार, तंत्रज्ञ, या क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्ती या सगळ्या पार्श्वभूमीवर चित्रनगरीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आणि येथे चित्रीकरणासाठी निर्मात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला, तर कोल्हापूर पुन्हा चित्रपटनिर्मितीचे केंद्र बनेल, असा विश्वास सिनेसृष्टीतील मान्यवरांनी  व्यक्त केला.शाहू स्मारक भवनात मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित कोल्हापूर चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याचा समारोप कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला गतवैभव कसे मिळवून देता येईल, या विषयावरील चर्चासत्राने झाला. यात चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील, अभिनेते राहुल सोलापूरकर, आनंद काळे, विजय पाटकर, अभिनेत्री अलका कुबल यांनी सहभाग घेतला.संजय पाटील म्हणाले, कोल्हापूर चित्रनगरीत सध्या दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. भविष्यात येथे मोठा स्टुडिओ, रेल्वे स्टेशन, वाडा, चाळ, सुसज्ज मेकअप रूम, निवासासाठी ५० खोल्या अशा अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार आहेत. शासन म्हणून चित्रनगरी चालण्यासाठी आम्ही ध्येयाने काम करीत आहोत. आता मुंबई-पुण्याच्या निर्मात्यांना येथे चित्रीकरणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांना इथपर्यंत घेऊन येणे गरजेचे आहे.आनंद काळे म्हणाले, कोल्हापुरात सध्या सात मालिका, दोन चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. हॉलिवूडपट येथे तयार झाला. निर्माते व चॅनेलना चित्रीकरणाच्या दरम्यान येऊ शकणाऱ्या अडचणी दूर केल्या की ते आनंदाने कोल्हापुरात चित्रीकरण करायला तयार होतात. चित्रनगरीचे सेट गोरेगावपेक्षा अप्रतिम झाले आहेत; पण चित्रीकरणासाठीच्या मूलभूत सुविधा नाहीत, त्या दूर केल्या तर एकही दिवस चित्रनगरी रिकामी राहणार नाही.विजय पाटकर म्हणाले, सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने चित्रीकरणासाठी मुंबईला प्राधान्य दिले जाते हे खरं असलं तरी मध्यंतरीच्या काळात कोल्हापूरचे लोक या क्षेत्रापासून, या मातीपासून दुरावले. येथील चित्रपट निर्मिती थांबली, सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. म्हणून कोल्हापूर मागे पडले. ते गतवैभव परत मिळवायचे असेल तर कोल्हापूरच्याच लोकांनी पुढाकार घ्यावा.राहुल सोलापूरकर यांनी या चर्चासत्राचे बहारदर निवेदन करीत कोल्हापूरला आपण पुन्हा चित्रपटसृष्टीचे माहेरघर कसे करू शकतो यावर मान्यवरांच्या संकल्पना जाणून घेतल्या. दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी प्रास्ताविकात या शहराला लाभलेल्या चित्रपट परंपरेची आठवण करून देत या क्षेत्राच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्व विशद केले. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी माई पाटील, सतीश बिडकर, सुभाष भुरके अशा सिनेव्यावसायिकांचा सत्कार करण्यात आला.डाटा ट्रान्स्फरची चिंता नकोयावेळी अलका कुबल यांनी मुंबई-कोल्हापूर हे अंतर जास्त असल्याने चित्रीकरणाचे साहित्य पोहोचविणे, नैसर्गिक आपत्ती आली की चित्रीकरण थांबणे, कलाकारांची गैरसोय, चित्रीकरण झालेले शूट पाठविणे अशा तांत्रिक अडचणी येतात असे सांगितले. यावर संजय पाटील म्हणाले, चित्रनगरीमध्ये हा डाटा ट्रान्स्फर करण्यासाठी विशेष इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. अवघ्या चार तासांच्या आत सगळे शूट मुंबईला पोहोचेल; त्यामुळे त्याची चिंता नको.

 

 

टॅग्स :cultureसांस्कृतिकkolhapurकोल्हापूर