शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

कोल्हापूर : कचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:49 PM

स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.

ठळक मुद्देकचऱ्याचे ढीग हटवून बनविले विरंगुळा केंद्र उपक्रमातून पालटले जागेचे रूपडेच

कोल्हापूर : स्वच्छ कोल्हापूर संकल्पनेचा निर्धार करून कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र साकारले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या पुढाकाराने उभारलेल्या या विरंगुळा केंद्राचा फायदा ज्येष्ठांसह पक्ष्यांनाही होत आहे. भविष्यात येथे ओपन जीम सुरू करण्यात येणार आहे. कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीयुक्त जागेचे रूपडेच या उपक्रमातून पालटले आहे.कोल्हापूर शहरातील राजारामपुरीतील दुसऱ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर हा कचऱ्यांचा कोंडाळा होता. या ठिकाणी तीन गल्लींतील कचरा, बिल्डिंग वेस्टेज येऊन पडत होते. दुर्गंधीमुळे येथून येता-जाता नाक धरून जावे लागत होते. माश्यांचा प्रादुर्भाव वाढला होता.दुर्गेश लिंग्रस यांनी सर्वप्रथम २०१० मध्ये हा कोंडाळा हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्ह्याधिकाऱ्यांनी या परिसरातील कचरा हटविण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांनीही हातभार लावत या परिसरात वेगवेगळ्या प्रकारची रोपे लावली.

आता या परिसराने बाळसे धरले आहे. आता येथे फायकस, कडुनिंब, औदुंबर, वड, सीताफळ, बोगनवेल बहरल्यामुळे या परिसराला वेगळेच रूप आले आहे. सुरुवातीला लावलेले वडाचे रोप आता १५ फूट उंच वाढून सावलीही देऊ लागले आहे.जैवविविधतेचे आकर्षणया परिसरात फुलपाखरेही बागडू लागली आहेत. पावसाळ्यात बेडकांचे हे ठिकाण ठरलेले आहे. यामुळे जैवविविधता वाढू लागली आहे. परिसरात वानरांचा उच्छाद असतो; मात्र या परिसराला चक्क त्यांनी आपल्या विश्रांतीचे ठिकाण बनवले आहे.

सकाळ-सायंकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ, महाविद्यालयीन मुले, परिसरातील लहान मुले, महिला यांच्यासाठी ही जागा आता विरंगुळ्याचे केंद्र बनले असल्यामुळे या जागेचे रूपच पालटले आहे. या परिसराला हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असे नामकरण केले आहे.

परिसरातील नागरिकांनी हा परिसर विकसित करण्यात हातभार लावला आहे. उद्योगपती अजय देसाई, शीतल संघवी, विद्यानंद बेडेकर यांनी जाणीवपूर्वक हा परिसर जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी सहकार्य केले आहे. या परिसरात रात्री विद्युत रोषणाईही केली आहे. यासाठी महानगरपालिकेने मोठे सहकार्य केले आहे.- दुर्गेस लिंग्रस,शिवसेना शहरप्रमुख

 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नkolhapurकोल्हापूर