शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : शाळा वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर उतरणार रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:52 IST

सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत.

ठळक मुद्देशाळा वाचविण्यासाठी शुक्रवारी कोल्हापूरकर उतरणार रस्त्यावरजिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाशिक्षण वाचवा नागरी कृती समितीचे आंदोलन

कोल्हापूर : सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी कोल्हापूरकर शुक्रवारी रस्त्यावर उतरणार आहेत. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी अकरा वाजता महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, महापौर स्वाती यवलुजे करणार आहेत.शासनाने राज्यातील शाळा बंद करून त्या कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासनाच्या या धोरणाची सुरुवात कोल्हापुरातील काही शाळा बंद करून झाली.

शासनाच्या या धोरणाच्या विरोधात शिक्षण वाचवा नागरी कृती समितीने गेल्या दोन महिन्यांपासून जनआंदोलन सुरू केले आहे. यातील एक टप्पा म्हणून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

गांधी मैदान येथून सुरू होणाऱ्या महामोर्चामध्ये पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि कोल्हापूरची जनता सहभागी होणार आहे. दरम्यान, या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करणारे संदेश गेल्या आठवड्यापासून सोशल मीडियावर फिरत आहेत. या संदेशांचे गुरुवारी प्रमाण वाढले.

लोकशाही मार्गाने लढासर्वसामान्य नागरिकांचा शिक्षणाचा मूलभूत अधिकार कायम राहावा यासाठी शासनाच्या धोरणाविरोधात कृती समितीचा लोकशाही मार्गाने गेल्या दोन महिन्यांपासून लढा सुरू आहे. विविध पद्धतीने जनआंदोलन सुरू असताना शासनाकडून आंदोलन दडपण्याचा प्रकार झाला, तरीदेखील कोल्हापूरकरांचा लढा कायम असल्याचे समितीचे समन्वयक अशोक पोवार यांनी सांगितले.

ते म्हणाले, समितीच्या आंदोलनाला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत असलेल्या २७ आणि अन्य १७ संघटनांनी पाठिंबा दिला आहे. महामोर्चा आणि समितीची भूमिका नागरिकांना माहिती व्हावी. या उद्देशाने गेल्या २२ दिवसांपासून विविध शाळांमध्ये घेतलेल्या पालक सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात महिला पालकांची संख्या लक्षणीय होती.

सर्वसामान्यांचे शिक्षण आणि शाळा वाचविण्यासाठी शासनाला जागे करण्यासाठी हा महामोर्चा आयोजित केला आहे. त्यात सुमारे ५० हजार कोल्हापूरकर सहभागी होतील. मोर्चाद्वारे समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देणार आहे.

मोर्चाचा मार्ग असागांधी मैदान, खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंग, मिरजकर तिकटी, देवल क्लब, बिंदू चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSchoolशाळाStudentविद्यार्थी