शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषद : स्वतंत्र लढल्याने भाजप-शिवसेनेचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 11:08 IST

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली.

ठळक मुद्देशिरोळ नगरपरिषद : स्वतंत्र लढल्याने भाजप-शिवसेनेचा पराभवदोन्ही काँग्रेससह ‘स्वाभिमानी’च्या आघाडीचा विजय

विश्वास पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसच्या आघाडीचा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना हा महत्त्वाचा घटक होणार असून, या तिन्हींच्या आघाडीच्या पहिल्या विजयाची नोंद सोमवारी शिरोळ नगरपरिषदेत झाली.

या नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपला धूळ चारून नगराध्यक्षासह दहा जागा जिंकून सत्ता काबीज केली. या विजयामुळे हे तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग येणार आहे. भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली तर त्यांचा पराभव होऊ शकतो याचेही प्रत्यंतर या निकालाने दिले आहे.गेल्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि खासदार शेट्टी यांनी पुुढाकार घेऊन महाआघाडी स्थापन केली व दोन्ही काँग्रेसच्या विरोधातील सर्व पक्षांची एकत्रित मोट बांधून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

राज्यात व केंद्रात सत्तांतर झाले, आता शेतकऱ्यांनाही अच्छे दिन येतील असे वाटत असतानाच मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याच्या रागातून खासदार शेट्टी यांनी मोदी यांच्या नेतृत्वाविरुद्धच रणशिंग फुंकले.

आता शेट्टी हे केंद्र व राज्यातूनही भाजपचे सरकार उलथवून टाका यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे त्यांचे दोन्ही काँग्रेससोबत आघाडी करण्याचे निश्चित झाले आहे. संघटनेची आघाडी ही काँग्रेसशी होणार आहे. त्या आघाडीची लिटमस चाचणी घेणारी निवडणूक म्हणून शिरोळच्या निवडणुकीकडे पाहिले गेले.शिरोळची नगरपरिषद म्हणून ही पहिलीच निवडणूक होती. तिथे मावळत्या सभागृहात ‘गोकुळ’चे संचालक व भाजपचे नेते अनिल यादव यांची सत्ता होती. तिथे शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र यड्रावकर हे एकत्र आले. त्यांना पडद्यामागून काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांनी ताकद दिली. त्यामुळे सत्तेचा गुलाल मिळाला. भाजपने स्वबळावर लढूनही चांगले यश मिळविले आहे. यापूर्वी काँग्रेस विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र असे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र दिसले.

शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील व ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बहुजन विकास आघाडी केली; परंतु त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. शिवसेनेचा भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न होता; परंतु भाजपने त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यांची युती झाली असती तर त्यांचीच सत्ता आली असती, हे वेगळे सांगायची गरज नाही.

नगरपरिषदेचे एकूण मतदान २१ हजार ७३१ आहे. एका नगरपरिषदेच्या निकालाचा फारसा परिणाम शिरोळ विधानसभा निवडणुकीवरही होणार नाही; परंतु कोण कुणासोबत जाणार व कुणाची काय अडचण होणार याचे आडाखे बांधण्यासाठी म्हणून मात्र या निकालाचा नक्कीच उपयोग होणार आहे.

नगरपरिषदेत एकत्र आलेल्या स्वाभिमानी व दोन्ही काँग्रेसची विधानसभेलाही मोठीच पंचाईत होणार आहे. कारण या तिन्ही पक्षांकडे विधानसभेचे उमेदवार लांगा घालून तयार आहेत. स्वाभिमानी काँग्रेससोबत राज्य आघाडीत सहभागी झाल्यास संघटनेचा या जागेवर दावा असेल. त्यावेळी या तिन्ही पक्षांचीही मोठीच कोंडी होणार आहे. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणRaju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूरBJPभाजपा