शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
5
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
6
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
10
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
11
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
12
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
13
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
14
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
15
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
16
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
17
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
18
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
19
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
20
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...

कोल्हापूर :  शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फ लाँग मार्च, शैक्षणिक धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 4:29 PM

शिक्षण आमच्या हक्काचे नाही मंत्र्यांच्या बापाचे, गरिबांचे वावडे कंपनी आवडे, शाळा वाचवा देश वाचवा, शासनाच्या नावाने बो..बो..बो.. अशा घोषणा आणि मोर्चा काढून शनिवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देशासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फ लाँग मार्च

कोल्हापूर : शिक्षण आमच्या हक्काचे नाही मंत्र्यांच्या बापाचे, गरिबांचे वावडे, कंपनी आवडे, शाळा वाचवा देश वाचवा, शासनाच्या नावाने बो..बो..बो.. अशा घोषणा आणि मोर्चा काढून शनिवारी शिक्षण वाचवा नागरी कृती समितीच्यावतीने शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांचा निषेध करण्यात आला.राज्य शासनाने नुकतेच १३१४ शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काही शाळा कंपन्यांना चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत, अर्थसंकल्पातही शिक्षणावरील खर्च कमी करण्यात आला आहे शासनाच्या या सगळ््या धोरणांचा निषेध करण्यासाठी आणि सर्वसामान्य कुटूंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी कृती समितीने शनिवारी महिलांच्या लाँग मार्चचे आयोजन केले होते.

गांधी मैदान येथून सुरू झालेल्या या लाँग मार्च मध्ये शासन तसेच शिक्षण मंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गांधी मैदान ते दसरा चौक या मार्गावरून येताना महिलांनी निषेधाच्या घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा विरोध केला.  दसरा चौकात महापौर स्वाती यवलुजे यांनी व नगरसेविका निलोफर आजरेकर यांनी मनोगत व्यक्त केले, त्यानंतर महिलांनी या प्रतिकात्मक अंत्ययात्रला चप्पल मारुन लाँग मार्चची सांगता केली.जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी देणारे विधेयक विधान परिषदेसमोर मांडले आहे, तसेच राज्यातील दहा पटाच्या आतील १३१४ शाळा बंद केल्या असून टप्प्याटप्प्याने ३० पटाच्या व नंतर त्यावरील पटाच्या शाळा बंद करण्याचे धोरण प्रस्ताविक आहे.

यामुळे गोरगरीब, बहुजन व वाड्यावस्त्यावरील मुले शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. शासन संविधानातील बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या कायद्याच्या विरोधातील धोरण राबवत आहे. त्यामुळे सामान्य जनतेत संताप निर्माण झाला असून राज्यभर आंदोलने होत आहेत.

शासनाने कंपन्यांना शाळा काढण्यास परवानगी देणारे विधेयक मागे घ्यावे व मराठी माध्यमांची एकही शाळा बंद करू नये. यावेळी प्रा. भरत रसाळे, गणी आजरेकर, कादर मलबारी, आफरीन सय्यद, सुवर्ण तळेकर, गिरीश फोंडे, रमेश मोरे, उपस्थित होते.

बहुजन समाजातील जनतेने शिकावं यासाठी शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाचे धोरण आमलात आणले आता मात्र शासन शाळा बंद करून आणि ते कंपन्यांना देवून शाहूंचे धोरणच मोडीत काढत आहे. सर्वसामान्य आणि गरीब कुटूंबातील मुलांचा विचार करून शासनाने आपला निर्णय बदलावा.स्वाती यवलुजे, महापौर 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र