शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
2
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
6
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
7
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
8
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
9
स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल 
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

कोल्हापूर विभागामध्ये यंदा उसाचे गाळप ५३ लाख टनाने घटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:51 PM

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे.

ठळक मुद्दे कारखान्यांचा ठोकताळा : महापुराचा फटका; तीन महिनेच हंगाम!

राजाराम लोंढे ।कोल्हापूर : महापुराने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाल्याने यंदा कोल्हापूर विभागात कसाबसा १ कोटी ७२ लाख टन ऊसच साखर कारखान्यांकडे गाळपासाठी येईल. गतवर्षीपेक्षा तब्बल ५३ लाख टन उसाच्या उत्पादनात घट होणार असल्याने हंगाम जेमतेम तीन महिनेच चालण्याचा ठोकताळा कारखान्यांचा आहे. सर्वाधिक फटका कोल्हापूर जिल्ह्यात बसणार आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक काळ पुराचे पाणी राहिल्याने तिथे मोठे नुकसान झाले आहे. तीच परिस्थिती सांगली जिल्ह्यातही पुराच्या पाण्याने झाली. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात ६१ हजार ९९९ हेक्टरवरील ऊस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले.

प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने घेतलेल्या आढाव्यात आगामी हंगामातील उसाच्या उत्पादनाचा अंदाज आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १०५ लाख, तर सांगली जिल्ह्यात ६७ लाख टन उसाचे गाळप होईल.गेल्या हंगामात कोल्हापूर जिल्ह्यात १३५ लाख टन, तर सांगलीत ९० लाख टन उसाचे गाळप झाले होते. या तुलनेत यंदा कोल्हापुरात ३० लाख, तर सांगलीत २३ लाख टनाने उसाच्या उत्पादनात घट होईल, असा अंदाज साखर विभागाचा आहे.१५ नोव्हेंबरनंतरच हंगामाला प्रारंभ!उसाची कमतरता आणि साखर उतारा पाहता, १ डिसेंबरपासून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर आहेत; पण पुणे विभागात उसाचे उत्पादन चांगले होईल, असा अंदाज असल्याने १ नोव्हेंबरपासूनच हंगामाला परवानगी द्यावी, अशी तेथील कारखानदारांची मागणी आहे, तर कोल्हापूर विभागात तीन महिनेच हंगाम चालेल एवढाच ऊस आहे. फेबु्रवारी फार तर मार्चच्या दुसºया आठवड्यात हंगाम संपणार असल्याने उताºयासाठी हंगाम उशिरा सुरू करण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतरच धुराडी पेटणार हे निश्चित आहे.

उघडीप नसल्याने वाढ खुंटलीसाधारणत: आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात उसाची वाढ जोमात होते. २००५ मध्येही महापुरात ऊसपिकाचे मोठे नुकसान झाले होते; पण पूर ओसरल्यानंतर ऊन पडल्याने पुरात सापडलेल्या उसासह उर्वरित उसाची वाढ होण्यास मदत झाली होती. पण यावेळेला आॅगस्टसह सप्टेंबरच्या निम्म्यापर्यंत वाढीस पोषक वातावरणच न राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

महापुरामुळे उसाचे नुकसान झाले आहेच, त्याचबरोबर अपेक्षित वाढ नसल्याने उत्पादन घटणार आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये उसाची जोमाने वाढ होते, पण या काळातच पावसाने झोडपून काढल्याने वाढ खुंटली आहे.- विजय औताडे,साखर उद्योगातील तज्ज्ञ

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेkolhapurकोल्हापूर