शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर रेल्वे ‘ट्रॅक’वर

By admin | Updated: July 18, 2015 00:20 IST

केंद्राचा हातभार : मूलभूत गोष्टींचा विकास करण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे

कोल्हापूर : शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू असलेले कोल्हापूर रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मपासून पादचारी पुलासारख्या मूलभूत सुविधांसाठी आजही झगडत असल्याचे चित्र असले, तरी देशभरातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास करण्याच्या योजनेस केंद्राने मंजुरी दिली आहे. या योजनेतील ‘अ’ वर्गात कोल्हापूर स्थानकाचाही समावेश झाल्यामुळे कोल्हापूर रेल्वेस्थानक आता खऱ्या अर्थाने विकासाच्या ‘ट्रॅक’वर येण्याची आशा आहे.पश्चिम महाराष्ट्रातील आर्थिक घडामोडींचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर शहरातील या रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन २००३ साली या रेल्वेस्थानकाचे नामकरण ‘छत्रपती राजर्षी शाहू महाराज टर्मिनस’ करण्यात आले. यानंतरच्या काळात या रेल्वेस्थानकाच्या विकासासंदर्भात अनेक नेत्यांनी घोषणा केल्या; पण त्यांची पूर्तता झाली नाही. प्लॅटफॉर्मची संख्या वाढली नाही, ना पादचारी पूल बांधण्यात आले. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनीही या रेल्वेस्थानकाच्या विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न केले नाहीत. केंद्राच्या रेल्वेस्थानक पुनर्विकास योजनेत कोल्हापूरच्या रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर रेल्वेस्थानकामधील विविध समस्यांवर टाकलेला हा प्रकाशझोत. (प्रतिनिधी) अतिक्रमित जागा ताब्यात घेणे गरजेचे परीख पूल ते जुने रेल्वे फाटक या दरम्यान रेल्वेची सुमारे साडेबारा एकर जमीन आहे. यातील बहुतांश जागेत अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ही जागा ताब्यात घेऊन या ठिकाणी जनरल डब्याने प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट खिडकी, सार्वजनिक प्रतीक्षागृह, सुलभ शौचालयांची उभारणी करता येणे शक्य आहे. यासाठी रेल्वेने ही अतिक्रमण केलेली जागा ताब्यात घेणे आवश्यक आहे. प्रतीक्षागृहांची संख्या पुरेशी नसल्यामुळे प्रवासी प्लॅटफॉर्मवर कुठेही बसतात. अनेकजण खाद्यपदार्थ खाऊन झाल्यानंतर उरलेसुरले तिथेच टाकून देतात. त्यामुळे रेल्वेस्थानकामध्ये अस्वच्छता हा कळीचा प्रश्न बनला आहे. जादा गाडीसाठी प्लॅटफॉर्मची संख्या वाढविणे आवश्यक आहे, अशी माहिती महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शिवनाथ बियाणी यांनी दिली.प्लॅटफॉर्म कोल्हापूर रेल्वेस्थानकाला १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्य रेल्वेचे हे शेवटचे स्थानक आहे; पण कोल्हापूर-पुणे रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कोल्हापूर रेल्वे कोकणला जोडावी या मागण्या खूप जुन्या आहेत.रेल्वेस्थानकामध्ये तीन प्लॅटफॉर्म आहेत. यांपैकी एक आणि तीन क्रमांकांचे प्लॅटफॉर्म अपुरे आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ यांची उंची खूपच कमी असल्यामुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या या प्लॅटफॉर्मची उंची वाढविण्याचे काम सुरू आहे; पण हे काम पूर्ण होण्यासाठी अद्यापही नऊ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आवश्यक कामे :प्लॅटफॉर्मच्या संख्येत वाढ, सध्या केवळ तीनच प्लॅटफॉर्म आहेत. जनरल प्रतीक्षागृहे सुरू करणे शौचालयांची संख्या वाढविणे रेल्वेस्थानक परिसरातील अतिक्रमणे काढणे परीख पूल आणि विक्रमनगर येथे पादचारी पूल उभारणे. पादचारी पुलाचा अभाव अन् जिवाला धोका परीख पूल येथे पादचारी पूल व्हावा, ही मागणी अनेक वर्षे प्रलंबित आहे. याशिवाय विक्रमनगर येथेही पादचारी पुलाची आवश्यकता आहे. या ठिकाणी पादचारी पूल नसल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणात या ठिकाणी पादचारी पूल होणे अत्यावश्यक आहे. आसनव्यवस्थेचा अभाव रेल्वेस्थानकाच्या तिकीटगृहामध्ये साधारण प्रवाशांसाठी आसनव्यवस्था नाही; त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी ताटकळत उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. गाडीला काही कारणाने विलंब झाला किंवा तिकिटांसाठी गर्दी असेल, तर प्रवाशांना बसण्याची अडचण निर्माण होते.