शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

दहशत माजविणाऱ्या गावगुंडांची गल्लीबोळांत 'वरात', कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांसमोर 'धुऊन' काढला दरारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:22 IST

पोलिसी खाक्या दाखवताच हात जोडले

कोल्हापूर : मित्राशी वाद घातलेल्या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गांधी मैदानाजवळ जीवघेणा हल्ला करणाऱ्या टोळीतील तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. ११) ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला. तिघे राहत असलेल्या वारे वसाहतीतून त्यांना तपासासाठी फिरवले. पोलिसांनी धुलाई करून केलेला विशेष पाहुणचार आणि स्वत:च्या गल्लीत आरोपी म्हणून फिरवल्याने गुंडांचा नूर उतरला. ओम चेतन आवळे (वय २२), ऋत्विक साठे आणि एका अल्पवयीन मुलाचा यात समावेश होता.जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेतील संध्यामठ गल्लीत राहणारा हर्षवर्धन उमेश मोरे (वय २७) याचा दहा दिवसांपूर्वी संभाजीनगर चौकात वैभव कुरणे याच्याशी किरकोळ कारणातून वाद झाला होता. याची माहिती कुरणे याने ओम आवळे या मित्राला दिली. त्यानंतर ५ जून रोजी रात्री ओम आवळे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी पाठलाग करून गांधी मैदानाजवळ हर्षवर्धन याला मारहाण केली. त्याच्या दुचाकीची तोडफोड करून दहशत माजवली होती. शहरात मध्यवस्तीत घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याने खळबळ उडाल्यानंतर पोलिस हल्लेखोरांच्या शोधात होते. यातील दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली, तर अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले.वारंवार सूचना देऊनही वारे वसाहत आणि परिसरातील तरुणांकडून गुंडगिरी वाढत असल्याने पोलिसांनी हा विषय गांभीर्याने हाताळला. ताब्यात घेतलेल्या तिघांचा पोलिस ठाण्यात विशेष पाहुणचार करण्यात आला. काही वेळ त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहणेही जमत नव्हते. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पुन्हा गुंडगिरी करणार नसल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील अन्य संशयितांचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.स्वत:च्याच गल्लीत मान खालीवारे वसाहतीत रुबाबात फिरून गुंडगिरी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बुधवारी दुपारी तपासासाठी त्यांच्या परिसरातून फिरवले. पोलिसांच्या गाडीतून उतरतानाच तोंड वाकडे करून विव्हळणाऱ्या तिघांकडे पाहताच परिसरातील नागरिकांना त्यांच्या विशेष पाहुणचाराचा अंदाज आला. त्यावेळी तिघेही मान खाली घालून चालत होते. वारंवार हात जोडून ते पोलिसांकडे माफी मागत होते. यातील ऋत्विक साठे हा चालताना टंगळमंगळ करीत होता. त्यावेळी पोलिसांनी आवाज वाढवून त्याच्या बकोटीला हात घालताच त्याचे उरलेसुरले अवसानही निघून गेले.

बेड्या, काढण्या बंदचार-पाच वर्षांपूर्वी गंभीर गुन्ह्यातील आरोपींना बेड्या आणि काढण्या घालून किंवा दोरीने बांधून त्यांची धिंड काढली जात होती. यातून काहीवेळा संशयित आरोपींवर अन्याय व्हायचा. याचा संदर्भ घेऊन मानवतावादी दृष्टिकोनातून न्यायालयाने आरोपींची धिंड काढण्यास मनाई केली आहे. त्यामुळे आता बेड्या, काढण्यांचा वापर होत नाही.पोलिस अधिकाऱ्यांचा इशाराआरोपींचे नातेवाईक आणि परिसरातील रहिवाशांना सार्वजनिक ठिकाणी बोलवून पोलिसांनी आरोपींचे कारनामे सांगितले. १६ ते २० वयोगटातील मुलांना वेळीच समज दिली नाही तर हेच उद्या मोठे गुन्हे करतील. एकमेकांचे खून पाडतील. त्यानंतर पालकांनी पश्चाताप करून काहीच होणार नाही. गुंडगिरी करण्याचा प्रयत्न पुन्हा कोणी केल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिस निरीक्षक झाडे यांनी दिला.