शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

Kolhapur Politics: जाहीरनामा झाला झकास; पण यावेळी तरी होणार का विकास?

By राजाराम लोंढे | Updated: April 29, 2024 17:37 IST

जुन्याच प्रश्नांना नवा मुलामा : आपण विकासाचे महामेरू कसे, हेच दाखवण्याचा प्रयत्न

राजाराम लोंढेकोल्हापूर : लाेकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीरनाम्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या जुन्याच प्रश्नांना नव्याने मुलामा देत ‘वचननामा’ झकास बनवला; पण यावेळी तरी प्रश्नांचा निपटारा होऊन कोल्हापूरचा विकास होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये स्थानिक प्रश्न कसे सोडवणार त्यापेक्षा केंद्र सरकार गेल्या दहा वर्षांत केलेली कामेच मतदारांवर बिंबवत आहे, तर काेल्हापूरचा सर्वांगीण विकास आम्हीच कसा करू शकतो? हे सांगण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि सत्ता आल्यानंतर त्याची कशा पद्धतीने पूर्तता करणार, याचा उहापोह करणारा जाहीरनामा असतो. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वचननामे प्रसिद्ध करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न असतो; पण सत्तेवर आल्यानंतर त्यातील किती प्रश्नांचा निपटारा होतो? हा खरा संशोधनाचा विषय आहे. गेल्या २५ वर्षांत ना कोल्हापूर बदललं ना येथील प्रश्न, प्रत्येक पाच-दहा वर्षांनी नेते बदलत गेले, एवढाचा काय तो फरक झाला आहे.

महायुतीच्या उमेदवारांकडून राज्य व केंद्र सरकार गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे, राबवलेल्या विविध योजनांच्या लाभार्थींसह आणलेला विकास निधी पुस्तिकेतून मतदारांसमोर मांडत आहे, तर, काँग्रेस आघाडीकडून कोल्हापूर खंडपीठ, तरुणाईसाठी रोजगारनिर्मिती, आयटी हब यासह आधुनिकतेची कास धरून विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा वचनामा घेऊन मतदारांसमोर जात आहेत. ऊस उत्पादन हे आपले प्रमुख पीक असल्याने साखर कारखान्यांभोवतच येथील राजकारण फिरते. त्यामुळे साखर उद्योगापुढील आव्हाने सोडवणे, ऊस दर हेही मुद्दे काहींच्या जाहीरनाम्यात दिसत आहेत.विकासाचे महामेरू कोण..आपणच कसे विकासाचे महामेरू आहोत, हेच उमेदवारांकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कोल्हापूरचे प्रश्न भिजत असताना रोज एक नवीन प्रश्न निर्माण होत आहे. 

केवळ जाहीरनाम्यातून आश्वासन देऊन मतदान मिळवले जाते, याची जाणीव कोल्हापूरकरांना झाली आहे. त्याची कुजबुज कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एवढ्यावर न थांबता ते प्रश्न मुळासह सोडवण्यासाठी कोण किती प्रयत्नशील राहतो, यावरच सर्व गणित अवलंबून आहे.

हजार कोटी गेले कोठे?काेल्हापुरात गेल्या अडीच वर्षांत एक हजार कोटींपेक्षा अधिक विकासनिधी आल्याचा दावा केला जात आहे. हा आकडा सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचा आहे. तरीही, हजारो कोटी रुपये खर्च झाले, मग माझं कोल्हापूर भकासच कसं? असा प्रश्न मात्र सामान्य कोल्हापूरकरांना पडतो.उत्पादन खर्चाच्या दीडपट दराचे काय?मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याची हमी दिली होती. गेली पाच वर्षे शेतकरी या हमीभावाच्या प्रतीक्षेत आहे. दीडपट राहू दे, उत्पादन खर्चाएवढा तरी दर मिळायला हवा. साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला; पण ३३०० रुपयांची शिफारस करून दोन वर्षे झाली, त्याच्या अंमलबजावणीचा कोणाच्याही जाहीरनाम्यात उल्लेख नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिक