शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Kolhapur Politics: जाहीरनामा झाला झकास; पण यावेळी तरी होणार का विकास?

By राजाराम लोंढे | Updated: April 29, 2024 17:37 IST

जुन्याच प्रश्नांना नवा मुलामा : आपण विकासाचे महामेरू कसे, हेच दाखवण्याचा प्रयत्न

राजाराम लोंढेकोल्हापूर : लाेकसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीरनाम्याच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचू लागले आहेत. यामध्ये कोल्हापूरच्या जुन्याच प्रश्नांना नव्याने मुलामा देत ‘वचननामा’ झकास बनवला; पण यावेळी तरी प्रश्नांचा निपटारा होऊन कोल्हापूरचा विकास होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामध्ये स्थानिक प्रश्न कसे सोडवणार त्यापेक्षा केंद्र सरकार गेल्या दहा वर्षांत केलेली कामेच मतदारांवर बिंबवत आहे, तर काेल्हापूरचा सर्वांगीण विकास आम्हीच कसा करू शकतो? हे सांगण्याचा आघाडीचा प्रयत्न आहे.राजकीय पक्ष प्रत्येक निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि सत्ता आल्यानंतर त्याची कशा पद्धतीने पूर्तता करणार, याचा उहापोह करणारा जाहीरनामा असतो. ग्रामपंचायतीपासून लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत वचननामे प्रसिद्ध करून मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न असतो; पण सत्तेवर आल्यानंतर त्यातील किती प्रश्नांचा निपटारा होतो? हा खरा संशोधनाचा विषय आहे. गेल्या २५ वर्षांत ना कोल्हापूर बदललं ना येथील प्रश्न, प्रत्येक पाच-दहा वर्षांनी नेते बदलत गेले, एवढाचा काय तो फरक झाला आहे.

महायुतीच्या उमेदवारांकडून राज्य व केंद्र सरकार गेल्या दहा वर्षांत केलेली विकासकामे, राबवलेल्या विविध योजनांच्या लाभार्थींसह आणलेला विकास निधी पुस्तिकेतून मतदारांसमोर मांडत आहे, तर, काँग्रेस आघाडीकडून कोल्हापूर खंडपीठ, तरुणाईसाठी रोजगारनिर्मिती, आयटी हब यासह आधुनिकतेची कास धरून विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा वचनामा घेऊन मतदारांसमोर जात आहेत. ऊस उत्पादन हे आपले प्रमुख पीक असल्याने साखर कारखान्यांभोवतच येथील राजकारण फिरते. त्यामुळे साखर उद्योगापुढील आव्हाने सोडवणे, ऊस दर हेही मुद्दे काहींच्या जाहीरनाम्यात दिसत आहेत.विकासाचे महामेरू कोण..आपणच कसे विकासाचे महामेरू आहोत, हेच उमेदवारांकडून दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून कोल्हापूरचे प्रश्न भिजत असताना रोज एक नवीन प्रश्न निर्माण होत आहे. 

केवळ जाहीरनाम्यातून आश्वासन देऊन मतदान मिळवले जाते, याची जाणीव कोल्हापूरकरांना झाली आहे. त्याची कुजबुज कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघात एवढ्यावर न थांबता ते प्रश्न मुळासह सोडवण्यासाठी कोण किती प्रयत्नशील राहतो, यावरच सर्व गणित अवलंबून आहे.

हजार कोटी गेले कोठे?काेल्हापुरात गेल्या अडीच वर्षांत एक हजार कोटींपेक्षा अधिक विकासनिधी आल्याचा दावा केला जात आहे. हा आकडा सामान्य माणसाच्या आकलनापलीकडचा आहे. तरीही, हजारो कोटी रुपये खर्च झाले, मग माझं कोल्हापूर भकासच कसं? असा प्रश्न मात्र सामान्य कोल्हापूरकरांना पडतो.उत्पादन खर्चाच्या दीडपट दराचे काय?मागील निवडणुकीत शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट दर देण्याची हमी दिली होती. गेली पाच वर्षे शेतकरी या हमीभावाच्या प्रतीक्षेत आहे. दीडपट राहू दे, उत्पादन खर्चाएवढा तरी दर मिळायला हवा. साखरेचा किमान हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपये केला; पण ३३०० रुपयांची शिफारस करून दोन वर्षे झाली, त्याच्या अंमलबजावणीचा कोणाच्याही जाहीरनाम्यात उल्लेख नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपतीsanjay mandlikसंजय मंडलिक