शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

Kolhapur North By Election Result: दणदणीत विजयानंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव भावूक, म्हणाल्या, ‘’या विजयाचं श्रेय…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 14:03 IST

Kolhapur North By Election Result Live: राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले.

कोल्हापूर - राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांना पराभूत केले. दरम्यान, या विजयानंतर जयश्री पाटील यांनी भावूक शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या विजयामध्ये दिवंगत पती चंद्रकांत जाधव यांनी ठेवलेला जनसंपर्क उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले.

विजयानंतर जयश्री राजे म्हणाल्या की, कोल्हापूरच्या जनतेने आपला शब्द पाळला आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला. तसेच महाविकास आघाडीने या निवडणुकीत जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. त्याबरोबरच नेते मंडळी, कार्यकर्त, माझी स्वाभिमानी जनता यांनी अण्णांच्या माघारी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. हा विजय हा कोल्हापूरमधील स्वाभिमानी जनचेचा आहे. महाविकास आघाडीचा आहे. अण्णांनी जे पेरलं ते उगवलं, असं मी म्हणेन. माझ्या विजयात महाविकास आघाडी, सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, मालोजीराजे, पदाधिकारी, स्वाभिमानी जनता आणि नगरसेवक यांचा हात आहे, असे त्यांनी सांगितले.

या निवडणुकीत मला मताधिक्य मिळणार ही अपेक्षा होती. जनता आमच्यासोबत होती. त्यांनी पूर्णपणे आम्हाला सहकार्य केलं. तसेच कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय निश्चित ठरलेला होता. चंद्रकांतदादांचा मुद्दा फोल ठरला आहे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. खरंतर ही पोटनिवडणूक लागायला नको होती. दिवंगत आमदार अण्णांची हक्काची पाच वर्षे होती. पण नियतीच्या मनात वेगळं होतं. दुर्दैवाने अण्णांच निधन झालं. परंतु भाजपाने पोटनिवडणूक लावली. खरं म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी मोठेपण दाखवायला हवं होतं. ते त्यांच्यासाठी चांगलं ठरलं असतं, असे त्यांनी सांगितले.

अण्णांनी प्रामाणिकपणे काँग्रेसचं काम केलं होतं. पतीचं अपूर्ण काम पूर्ण करणे पत्नीचं कर्तव्य म्हणून काँग्रेसचा झेंडा हाती घेतला, असे सांगत जयश्री जाधव यांनी आता जनतेची सेवा करायची आहे. अण्णांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. अण्णांचा आशीर्वाद आहेत, अशी भावना व्यक्त केली.

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरElectionनिवडणूकcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी