शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

कोल्हापूर : चित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 5:25 PM

आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.

ठळक मुद्देचित्रनगरीकडील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधीची गरजइंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा जीव टांगणीला

कोल्हापूर : आर. के.नगरकडून चित्रनगरीमार्गे महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण युद्धपातळीवर होणे आवश्यक असून, त्यासाठी पुरेसा निधीही देण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेने या बाबतीत तातडीने निर्णय घेण्याची गरज असून, पावसाळ्याआधी या ठिकाणचे काम सुरू करून पालकांना दिलासा देण्याची गरज आहे.आर. के.नगरकडून भारती विद्यापीठ आणि के. आय. टी. कॉलेजला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी या परिसरात ये-जा करीत असतात; तर या बाजूने हायवेलाही जाता येत असल्याने तीदेखील वाहतूक आता वाढली आहे.कंदलगाव कमान ते चित्रनगरीशेजारून जाणारा रस्ता हा एकेरी मार्ग आहे. त्यामुळे समोरून एखादा टेम्पो जरी आला तरी दुचाकी रस्त्यावरून खाली घ्यावी लागते. रस्त्याच्या काटाळ्या भरून न घेतल्याने गाडी खाली घेताना आणि पुन्हा रस्त्यावर आणताना नेहमी या ठिकाणी अपघात होत असतात.येथून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात; त्यामुळे अनेकदा समोरासमोरही अपघातांचे प्रकार घडले आहेत. त्यामुळेच या रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. यासाठी केवळ पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र हा निधी अपुरा असल्याने या संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यामधून होणे शक्य नाही.आता इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी पुन्हा या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे. प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी, त्यांचे पालक यांमुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. एका बाजूला चित्रनगरीची भिंत असल्यानेही या कडेने वाहने चालविताना अतिशय दक्षता घ्यावी लागते. यावर उपाय म्हणून विरोधी बाजूचे रुंदीकरण करून भराव टाकून घेण्याची गरज आहे.

पालकांचा जीव टांगणीलारस्त्याची ही अवस्था असल्याने या ठिकाणी कॉलेजला जाणाºया मुलामुलींच्या पालकांचा जीव दिवसभर टांगणीला लागलेला असतो. संध्याकाळी मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवात जीव नसतो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने तातडीने निधी वाढवून या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे.

‘केआयटी’कडील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पाच लाखचित्रनगरी ते केआयटी कॉलेज या ३०० मीटरच्या रस्त्याची तर अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या रस्त्यावरून गाडी चालविण्यापेक्षा रस्त्याच्या कडेने गाडी चालविणे पसंत करतात. मात्र यंदा जिल्हा परिषदेने यासाठी पाच लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम याच दोन दिवसांत सुरू होण्याची गरज असून ते दर्जेदार झाल्यास विद्यार्थ्यांसाठी हिताचे ठरणार आहे.

 

शहराबाहेर जाणाऱ्या या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण करणे आवश्यक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि नागरिकही जवळचा मार्ग म्हणून या मार्गाचा करीत असलेला वापर यांचा विचार करता या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण आवश्यक आहे. या रस्त्यावरून आमची मुले गाड्या घेऊन जातात. मात्र रस्त्याची अवस्था पाहून त्यांच्या हातात गाडी देण्यासाठीही मन धजावत नाही. रस्ता रुंदीकरण लवकर करणे आवश्यक आहे.विनायक कुलकर्णीपालक

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदroad transportरस्ते वाहतूक