शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कोल्हापूर :  प्राधिकरणची बैठक सरपंचांनी उधळली, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीने संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 18:28 IST

कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समितीची स्थापना केली.

ठळक मुद्देप्राधिकरणची बैठक सरपंचांनी उधळली, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीने संतापअधिकारी निरूत्तर, प्राधिकरण विरोधी समितीची स्थापना

कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समितीची स्थापना केली.आमदार सतेज पाटील यांनी २५ मे रोजी झालेल्या प्राधिकरणच्या बैठकीमध्ये प्राधिकरणाबाबत सरपंचांनाच सविस्तर माहिती देण्याची गरज आहे. तेव्हा त्यांची बैठक बोलवा अशी सुचना केली होती. पालकमंत्र्यांनी अशी बैठक जिल्हा परिषदेत घ्या असे प्राधिकरणला निर्देश दिले. त्यानुसार राजर्षि शाहू सभागृहामध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती.सुरूवातीला प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी स्वागत केले आणि बैठकीचा हेतू सांगितला. यानंतर आर.ए पाटील यांनी सादरीकरणाव्दारे प्राधिकरणाबाबत माहिती दिली. दरम्यान बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक या मधूनच निघून गेल्या.

हे सादरीकरण झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य एस.आर. पाटील यांनी चर्चेला सुरूवात केली. ते म्हणाले, आम्ही फाळा भरला असेल तर ग्रामस्थाला पाहिजे तो दाखला १५ मिनीटात देतो. तुमच्याकडे मात्र अनेक बंधने आहेत. आठ महिने झाले बांधकामाचे दाखले बंद आहेत. आम्हांला गावचा विकास पाहिजे. पण अधिकार काढून घेऊन, बंधने घालून तो नको. त्यापेक्षा गावाला सक्षम अधिकारी द्या.वडणगे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, २0१५ पासून एकीकडे गावठाणातील बांधकामाचीही परवानगी शासनाने काढून घेतली आहे. आता पुन्हा प्राधिकरणची बंधने येणार आहेत. ग्रामपंचायतींनी काम कसे करायचे.

यावेळी गोंधळाला सुरूवात झाली. शिवराज पाटील हे हा परवाना ग्रामपंचायतीला देता येतो असे सांगत होते तर खालून सरपंच यासाठी नगररचना विभागाची पायरी चढावी लागते. ते सोयीचे नाही असे सांगत होते. यातून गोंधळ वाढत गेला.

करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सुर्यवंशी हे आपण नेमकी माहिती ऐकून घेवू असे सांगत होते. मात्र त्यांचे कुणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अमर पाटील (शिंगणापूर),बाजीराव पाटील (शिये), उत्तम पाटील (सरपंच,निगवे),दिनकर आडसुळ (उपसरपंच निगवे दुमाला),प्रकाश रोटे (सरपंच शिंगणापूर), शरद निगडे (निगडेवाडी), संध्या पाटील (सरपंच गिरगाव), विक्रम कराडे (निगवे दुमाला), उदय सुतार (भुयेवाडी),शशिकांत खवरे (सरपंच, पुलाची शिरोली) यांनी समोर येत जोरजोरात आपली मते मांडायला सुरूवात केली.‘हटाव हटाव, प्राधिकरण हटाव’,‘ प्राधिकरण मान्य नाही’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी आपण माहिती घ्या, त्यातून आपले जे प्रश्न असतील ते लेखी दया.त्यावरही स्वतंत्र बैठक घेता येईल असे सांगितले. परंतू घोषणा देत अखेर सर्वजण सभागृहाच्या बाहेर पडले. यानंतर बाहेर समांतर सभा घेण्यात आली.

येथे राजेंद्र सुर्यवंशी आणि हातकणंगले सभापती रेश्मा सनदी यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण विरोधी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राधिकरण स्वीकारायचे नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला.एवढ्यात आत ग्रामसेवकांची बैठक सुरू असल्याचे लक्षात येताच पुन्हा सर्वजण घोषणा देत सभागृहात आले. एकीकडे सरपंच उठून गेल्यानंतर तुम्ही बैठक कशी सुरू ठेवली अशी विचारणा सर्वांंनीच शिवराज पाटील यांना केली. ‘गाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनाही सरपंचांनी सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले.

गावात काम करायचंय का नाही?सरपंच सभेवर बहिष्कार टाकून बाहेर गेले तरी समोर जिल्हा परिषदेचे अधिकारी असल्याने ग्रामसेवक बसूनच राहिले. बाहेर समांतर सभा झाल्यानंतर सरपंच पुन्हा सभागृहात आले. सभापती सुर्यवंशी यांनीच ग्रामसेवकांना ‘तुम्हांला गावात काम करायचे की नाही’ अशी विचारणा केली. तरीही ग्रामसेवक बसून होते. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी उठून गेल्यावर सर्वजण बाहेर पडले.

इथं राडा व्हायला पाहिजे काय?आम्ही नसताना बैठक कशी घेता अशी विचारणा करत एका कार्यक र्त्याने यावेळी हे कोल्हापूर आहे. इथं राडा व्हायला पाहिजे काय अशी थेट विचारणा अधिकाऱ्यांना केल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर पडले.

उप्पीट देवून तोंड बंद करताय का?सादरीकरणानंतर चर्चा सुरू झाली. तेव्हा लगेचच सर्वांसाठी उप्पीट आणले गेले. तेव्हा प्रश्नांची उत्तरे नीटपणे न देता आमची तोंडं बंद करायला उप्पीट आणले काय अशी विचारणा केली गेली. सरपंचांनी हा नाश्तादेखील यावेळी घेतला नाही.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरsarpanchसरपंच