शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

कोल्हापुरात पन्नास टक्के पाणी जमिनीत मुरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

मोठ्या प्रमाणात असलेली तूट, तसेच वाढता खर्च यामुळे कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. केवळ कर्तव्य ...

मोठ्या प्रमाणात असलेली तूट, तसेच वाढता खर्च यामुळे कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. केवळ कर्तव्य म्हणून महापालिकेने तोट्यातील हा विभाग चालविण्याची कसरत अनेक वर्षांपासून करीत आहे. परंतु भविष्यकाळात या विभागाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर एक दिवस हा विभाग फायद्यात येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

बारामाही वाहणारी पंचगंगा नदी हे शहराच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. नदीतून प्रतिदिन १२० ते १३० द.ल.घ.मी. इतका पाणी उपसा केला जातो. परंतु, यापैकी ६५ ते ६८ द.ल.घ.मी. पाण्याचेच बिलिंग होते. मग बाकीचे पाणी जाते कोठे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. शहरातील साठ ते सत्तर वर्षांपूर्वी घातलेल्या जलवाहिन्या आता खूपच जीर्ण झालेल्या आहेत. सार्वजनिक जलवाहिन्या जशा जीर्ण झालेल्या आहेत, तशाच खासगी नळधारकांच्या जलवाहिन्याही जीर्ण झालेल्या आहेत. त्या जमिनीत खोलवर सापडल्या आहेत. त्यामुळे गळती शोधणे आणि ती काढणे म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशी स्थिती आहे.

पॉईंटर -

- पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट - ५० ते ५५ कोटी

- शहरातील गळती काढण्यावर होणारा खर्च - ६० ते ७० लाख

- पाणीपुरवठा विभागाचे वीज बिल खर्च - २३ ते २८ कोटी वार्षिक

- पाणीपुरवठा विभागाकडील एकूण कर्मचारी - ३७५ कार्यरत

बरीच वर्षे गळती सुरू-

गेली अनेक वर्षे पाण्याची गळती सुरू आहे. ती काढण्याचा प्रशासन प्रयत्न करीत असते; परंतु या जलवाहिन्या खोलवर गाडल्या गेल्या आहेत. गळती काढायची म्हटले तर बरीच खुदाई करावी लागते. रस्ते खराब होतात. त्यामुळे मोठी गळती वगळता अन्य छोट्या गळती काढल्या जात नाहीत.

अधिकाऱ्याचा कोट -

अमृत योजनेमधून जुन्या खराब व कालबाह्य जलवाहिन्या बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे विविध भागातील गळतीचे प्रमाण कमी होऊन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले की मग ही गळती नव्वद टक्क्यांपर्यंत दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

नारायण भोसले, जलअभियंता

महानगरपालिका,