शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

कोल्हापुरात पन्नास टक्के पाणी जमिनीत मुरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:16 IST

मोठ्या प्रमाणात असलेली तूट, तसेच वाढता खर्च यामुळे कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. केवळ कर्तव्य ...

मोठ्या प्रमाणात असलेली तूट, तसेच वाढता खर्च यामुळे कोल्हापूर शहर पाणीपुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्यासारखे आहे. केवळ कर्तव्य म्हणून महापालिकेने तोट्यातील हा विभाग चालविण्याची कसरत अनेक वर्षांपासून करीत आहे. परंतु भविष्यकाळात या विभागाकडे गांभीर्याने लक्ष दिले तर एक दिवस हा विभाग फायद्यात येईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

बारामाही वाहणारी पंचगंगा नदी हे शहराच्या पिण्याच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. नदीतून प्रतिदिन १२० ते १३० द.ल.घ.मी. इतका पाणी उपसा केला जातो. परंतु, यापैकी ६५ ते ६८ द.ल.घ.मी. पाण्याचेच बिलिंग होते. मग बाकीचे पाणी जाते कोठे? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. शहरातील साठ ते सत्तर वर्षांपूर्वी घातलेल्या जलवाहिन्या आता खूपच जीर्ण झालेल्या आहेत. सार्वजनिक जलवाहिन्या जशा जीर्ण झालेल्या आहेत, तशाच खासगी नळधारकांच्या जलवाहिन्याही जीर्ण झालेल्या आहेत. त्या जमिनीत खोलवर सापडल्या आहेत. त्यामुळे गळती शोधणे आणि ती काढणे म्हणजे ‘चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला’ अशी स्थिती आहे.

पॉईंटर -

- पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट - ५० ते ५५ कोटी

- शहरातील गळती काढण्यावर होणारा खर्च - ६० ते ७० लाख

- पाणीपुरवठा विभागाचे वीज बिल खर्च - २३ ते २८ कोटी वार्षिक

- पाणीपुरवठा विभागाकडील एकूण कर्मचारी - ३७५ कार्यरत

बरीच वर्षे गळती सुरू-

गेली अनेक वर्षे पाण्याची गळती सुरू आहे. ती काढण्याचा प्रशासन प्रयत्न करीत असते; परंतु या जलवाहिन्या खोलवर गाडल्या गेल्या आहेत. गळती काढायची म्हटले तर बरीच खुदाई करावी लागते. रस्ते खराब होतात. त्यामुळे मोठी गळती वगळता अन्य छोट्या गळती काढल्या जात नाहीत.

अधिकाऱ्याचा कोट -

अमृत योजनेमधून जुन्या खराब व कालबाह्य जलवाहिन्या बदलण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे विविध भागातील गळतीचे प्रमाण कमी होऊन वाया जाणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले की मग ही गळती नव्वद टक्क्यांपर्यंत दूर होईल, अशी अपेक्षा आहे.

नारायण भोसले, जलअभियंता

महानगरपालिका,