शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

Kolhapur- शक्तिपीठ महामार्ग: १२ जुलै पर्यंत रद्दचा निर्णय घ्या, अन्यथा..; सतेज पाटील यांचा सरकारला इशारा

By राजाराम लोंढे | Updated: June 18, 2024 15:42 IST

कोल्हापुरात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कोल्हापूर : नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या दडपशाही धोरणाला कडाडून विरोध केला. सरकारने १२ जुलै पर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोको करु, जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरुन हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिला.शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी स्वयंस्फुर्तीने सहभागी झाल होते. ‘राज्य सरकारचे करायचे काय?’, ‘खोकेबाज सरकारचा धिक्कार असो’, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी दुपारी साडे बारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळेली झालेल्या सभेत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री, आमदार शक्तीपीठ विरोधातील भूमिका घेत असताना प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना नोटीसा कशा काढतात? या रस्त्यावर शेतकऱ्यांनी यापुर्वी हरकती नोंदवल्या होत्या, त्याची सुनावणी न घेता दाबून निर्णय घेणार असाल तर ते खपवून घेणार नाही. आंदोलनात फुट पाडण्याचा डाव राज्य सरकारचा असून एखाद्याला ५० लाखांचा धनादेश दिला जाईल, पण त्याला भुलू नका. कोणत्याही परिस्थितीत एक इंचही जमीन रस्त्यासाठी देणार नाही, याची शपथ घेऊनच येथे घरी जाऊया.खासदार शाहू छत्रपती,  ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे, डॉ. भारत पाटणकर, के. पी. पाटील, विजय देवणे, शिवाजी मगदूम, संपत देसाई, गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

शुक्रवारपर्यंत १०० टक्के हरकती द्यातांत्रीक लढाईत कोठेही मागे पडू नये, यासाठी शुक्रवार (दि. २१) पर्यंत १०० टक्के हरकती गोळा करा. न्याय  व्यवस्थेवर विश्वास आहे, पण आता न्यायालयात न जाता रस्त्यावरच लढाई लढायची असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.तर कागलची जनता राजकारणावर बुलडोझर फिरवेलउद्धवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केले. महामार्ग कागलमधून जातो, याचे भान ठेवा, अन्यथा तुमच्या राजकारणावर बुलडोझर फिरवल्याशिवाय कागलची जनता गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गagitationआंदोलनFarmerशेतकरीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील