शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

कोल्हापूर :शेतकऱ्यांनी कांदे सौदे बंद पाडले, संतप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीसमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:54 PM

कोल्हापूर : शुक्रवारी १७00 ते १९00 क्विंटल असणारा कांदा शनिवारी ७00 ते ११00 पर्यंत खाली आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यां ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी कांदे सौदे बंद पाडले, कांद्याचे दर प्रतिक्विंटल ७00 रुपयांवर संतप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीसमोर ठिय्याव्यापारी, बाजार समिती संगनमताने लूट करत असल्याचा आरोप

कोल्हापूर: शुक्रवारी १७00 ते १९00 क्विंटल असणारा कांदा शनिवारी ७00 ते ११00 पर्यंत खाली आल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यां नी शनिवारी बाजार समितीतील सौदेच बंद पाडले. व्यापारी व बाजार समितीने संगनमत करुन दर पाडले आहेत, असा आरोप करत कांदे घेउन आलेल्या परजिल्ह्यातील विशेषता सोलापुरातील शेतकऱ्यांनी बाजार समिती कार्यालयासमोर निदर्शने करुन ठिय्या मारत आपला रोष व्यक्त केला. बाजार समिती सभापती व सचिवांनी आक्रमक शेतकऱ्यांची समजूत काढल्यानंतर दोन तासांनी सौदे पुर्ववत झाले.

कांद्याचे दर पडल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडल्यामुळे समितीत कांदा पडून राहिला होता.कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बाहेरील जिल्ह्यातीलच कांदे मोठ्या प्रमाणावर येतात. शनिवारी पुण्याचा बाजार बंद असल्याने कोल्हापुरात येणाऱ्या कांद्याची आवक अचानक वाढली. दररोज ७0 ते ९0 ट्रक येत असताना शनिवारी ही संख्या ११0 वर गेली. कांद्याची आवक वाढल्याने सौदेही उशिरा सुरु झाले.

साडेअकराच्या सुमारास अशोक मोटूमल यांच्या अडत दुकानी सौदे काढण्यास सुरुवात झाली. सौद्यात उच्च प्रतीच्या एक नंबर कांद्याला किमान ७00 ते कमाल ११00 रुपये भाव निघाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार हरकत घेतली. शुक्रवारी १७00 ते १९00 रुपये प्रतिक्विंटल असणारा भाव अचानक एका दिवसात ७00 ते ११00 कसा झाला याबद्दल व्यापाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने सर्व शेतकऱ्यांनी सौदेच काढणे बंद करत बाजार समितीच्या कार्यालयात धाव घेतली.समिती सभापती कार्यालयात नसल्याने ते येउ पर्यंत कार्यालयासमोरुन उठणार नसल्याचा पवित्रा घेत शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. अखेर तासाभरांनी सभापती कृष्णात पाटील आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

कोल्हापूर बाजार समितीवर विश्वास असल्याने गेली २५ वर्षे कांदा घेउन येतोय, त्यातून तुम्हाला उत्पन्नही मिळतेय. पण आतापर्यंत एवढी फसवणूक कधी झाली नाही. हे असेच चालणार असेल तर आम्ही कोल्हापुरात कांदाच घेउन येणार नाही असा इशारा सोलापुरातील एका शेतकऱ्यांने दिला.

सभापती पाटील यांनी आवक वाढल्याने दरावर परिणाम झाला आहे, पण त्यात नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला. या वेळी कांदा बटाटा असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर चूग, समिती संचालक विलास साठे, भगवान काटे, समिती सचिव मोहन सालपे, सहसचिव के.बी.पाटील यांची उपस्थिती होती.

 

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डonionकांदाkolhapurकोल्हापूर