शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 10:43 IST

देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणीमहाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

कोल्हापूर : देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त ४५५ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयात वीज जोडणी देण्यात आली. तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ६५  या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेडयांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेडयांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या गोर-गरीब जनतेला वीज जोडणी देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेडयाला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांना वीज जोडणी देण्यात आली आहे, ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभा मिळाला आहे.विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणीसौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४० खेडयांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाडयातील ८ जिल्हयातील ४२ खेडयांतील २ हजार९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोलीजिल्हयात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ५६५ घरांना,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १०२ घरांना, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ५९ घरांना, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ५ घरांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यातआली आहे.मराठवाडयातील २ हजार ९३८ घरांना वीज जोडणीया योजनेंतर्गत मराठवाडा विभागात नांदेड जिल्हयात सर्वात जास्त १२१७ घरात वीज जोडणी देण्यात आली या जिल्हयातील २० खेडयांमध्ये ही जोडणी देण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील ३ खेडयांमधील ४०४ घरांना, औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ७२ घरांना, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील १५७ घरांना, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ४८० घरांना, लातूर जिल्हयातील ७ खेडयांतील ३४९ घरांना, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील ७८ घरांना आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील १८१ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.खान्देशातील जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर