शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 10:43 IST

देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणीमहाराष्ट्रातील ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी

कोल्हापूर : देशातील गोर-गरीब जनतेच्या घरात वीज पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्हयातील २२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हयात या योजनेंतर्गत सर्वात जास्त ४५५ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे, या जिल्हयात एकूण ७ खेडयात वीज जोडणी देण्यात आली. तसेच सातारा जिल्हयातील एका खेडयात ६५  या सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे.

आतापर्यंत देशातील १६ हजार ८५० खेडयांना मोफत वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील १९२ खेडयांचा यात समावेश असून ८ हजार ८२० घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या ग्राम स्वराज विभागाच्यावतीने व केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या मदतीने देशातील वीज जोडणीपासून वंचित असलेल्या गोर-गरीब जनतेला वीज जोडणी देण्यासाठी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर-सौभाग्य योजना सप्टेंबर २०१७ मध्ये सुरु करण्यात आली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचे उदघाटन करण्यात आले. या योजनेनुसार देशातील प्रत्येक खेडयाला मार्च २०१९ पर्यंत वीज जोडणी देण्याचे उदिष्टय ठेवण्यात आले असून गेल्या ७ महिन्यांपासून आजपर्यंत देशभरातील २७ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील १६ हजार ८५० खेडयांना वीज जोडणी देण्यात आली आहे, ज्याद्वारे ५ लाख १९ हजार ३५८ घरांना जोडणीचा लाभा मिळाला आहे.विदर्भातील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणीसौभाग्य योजना सुरु झाल्यापासून राज्यातील एकूण २३ जिल्हयांतील १९२ खेडयांना या योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यात आली आहे. यानुसार विदर्भातील सर्वच ११ जिल्हयांतील १४० खेडयांतील ५ हजार २३७ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. मराठवाडयातील ८ जिल्हयातील ४२ खेडयांतील २ हजार९३८ घरांना, पश्चिम महाराष्ट्रातील तीन जिल्हयातील ९ खेडयांतील ५४२ घरांना वीज जोडणी देण्यात आली आणि खान्देशातील १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.सौभाग्य योजनेंतर्गत विदर्भात सर्वात जास्त गडचिरोलीजिल्हयात वीज जोडणी देण्यात आल्या. गडचिरोली जिल्हयातील ८ खेडयांतील ११५९ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यासोबत अकोला जिल्हयातील ३४ खेडयांमधील ४१० घरांना, अमरावती जिल्हयातील २५ खेडयांमधील ७३५ घरांना, भंडारा जिल्हयातील ७ खेडयांतील २४४ घरांना, बुलडाणा जिल्हयातील २२ खेडयांतील ५६५ घरांना,चंद्रपूर जिल्हयातील ७ खेडयांतील ७४४ घरांना, नागपूर जिल्हयातील ४ खेडयांतील १०२ घरांना, गोदिंया जिल्हयातील ३ खेडयांतील ५९ घरांना, वाशिम जिल्हयातील १५ खेडयांतील ४२६ घरांना, यवतमाळ जिल्हयातील १३ खेडयांतील ७८८ घरांना, वर्धा जिल्हयातील २ खेडयांतील ५ घरांना सौभाग्य योजनेंतर्गत वीज जोडणी देण्यातआली आहे.मराठवाडयातील २ हजार ९३८ घरांना वीज जोडणीया योजनेंतर्गत मराठवाडा विभागात नांदेड जिल्हयात सर्वात जास्त १२१७ घरात वीज जोडणी देण्यात आली या जिल्हयातील २० खेडयांमध्ये ही जोडणी देण्यात आली. अहमदनगर जिल्हयातील ३ खेडयांमधील ४०४ घरांना, औरंगाबाद जिल्हयातील एका खेडयातील ७२ घरांना, बीड जिल्हयातील ३ खेडयांतील १५७ घरांना, हिंगोली जिल्हयातील ५ खेडयांतील ४८० घरांना, लातूर जिल्हयातील ७ खेडयांतील ३४९ घरांना, उस्मानाबाद जिल्हयातील २ खेडयांतील ७८ घरांना आणि जालना जिल्हयातील एका खेडयातील १८१ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.खान्देशातील जळगाव जिल्हयातील एका खेडयामध्ये या योजनेंतर्गत १०३ घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर