शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कोल्हापूर : ग्रामीण रुग्णालयात मिळणार दिव्यांग प्रमाणपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 00:40 IST

केवळ जिल्हा रुग्णालयातूनच देण्यात येणारी दिव्यांग प्रमाणपत्रे आता उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधूनही मिळणार आहेत.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा निर्णय,२१ दिव्यांग प्रकारांचा समावेश; शासनाने आणली सुलभता शासनाने ही सुधारणा केल्याने प्रमाणपत्र मिळविणे सुलभ होणार

समीर देशपांडे ।कोल्हापूर : केवळ जिल्हा रुग्णालयातूनच देण्यात येणारी दिव्यांग प्रमाणपत्रे आता उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालयांमधूनही मिळणार आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने यामध्ये सुलभता आणल्याने आता दिव्यांग प्रमाणपत्रे तपासणीनंतर त्वरित आणि गावाजवळच्या रुग्णालयात मिळणार आहेत.

आरोग्य विभागाच्या वतीने ३ डिसेंबर २0१२ पासून एसएडीएम या संगणकीय प्रणालीद्वारे केवळ सहा प्रकारच्या दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत असे. मात्र, केंद्र शासनाने २८ डिसेंबर २0१६ रोजी ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २0१६’ संमत केल्याने आता २१ दिव्यांग प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.मात्र, अशा प्रकारची प्रमाणपत्रे केवळ जिल्हा रुग्णालयामध्येच दिली जात.

पहिल्यांदा तपासणीसाठी, नंतर प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याला फेऱ्या माराव्या लागत असत. त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत होते.यामध्ये आता शासनाने सुधारणा केली असून, आता तपासणी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्याचे अधिकार उपजिल्हा / ग्रामीण रुग्णालय, शासकीय / महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक, अधिष्ठाता यांनाही दिले आहेत. त्यामुळे आता यापुढे

दिव्यांगांना त्यांचे गाव ज्या रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात आहे, अशा ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी जावे लागणार असून, तेथूनच त्यांना प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. प्रत्येक रुग्णालयामध्ये यासाठी तीनसदस्यीय समिती राहणार असून, यांच्यामार्फतच ते प्रमाणपत्र देण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सध्या सर्व दिव्यांगांची तपासणी आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचा भार एकाच जिल्हा रुग्णालयावर दिला गेल्याने यासाठी विलंब होत होता. मात्र, शासनाने ही सुधारणा केल्याने प्रमाणपत्र मिळविणे सुलभ होणार आहे.यांना मिळणार प्रमाणपत्रेया योजनेतून २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना लाभ दिला जाणार आहे. शासनाच्या जुन्या नियमानुसार अंध, बहिरे, मुके, हात, पायाने दिव्यांग, स्वमग्न अशा काही मोजक्या वर्गांतील दिव्यांगांचा समावेश केला जात असे. मात्र, आता केंद्र शासनाने नव्याने काही प्रकारांचा समावेश केला आहे. त्यानुसार पूर्णत: अंध, अंशत: अंध, कर्णबधिर, वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्ययन अक्षम, मेंदूचा पक्षाघात, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्ठरोग, बुटकेपणा, बौद्धिक अक्षमता, मांसपेशीय क्षरण, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, मल्टिपल स्केलेरोसिस, थॅलसेमिया, अधिक रक्तस्राव, सिकल सेल, अ‍ॅसिड अटॅक, कंपवात रोग हे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgovernment schemeसरकारी योजना