शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा पाय खोलात; नेतृत्वाचा लागणार कस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 13:36 IST

शिवसेना आणि भाजप सत्तेत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातही या दोघांचे फारसे सख्य नव्हते; परंतु युतीधर्मामुळे प्रचार प्रारंभ, सभा, मेळावे एकत्र घेतले जात होते. मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या सहकार्यातून खासदार झालेले संजय मंडलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली.

ठळक मुद्देसामूहिक कोंडीची शक्यता

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील सत्तेचा दोन दिवसांसाठी प्रज्वलित झालेला भाजपचा दिवा अखेर मंगळवारी दुपारी विझला; त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या भाजपचा कोल्हापूर जिल्ह्यात पाय आणखी खोलात गेला आहे. सामूहिक कोंडीचा अनुभव भाजपला जिल्ह्यात घ्यावा लागणार असून, यापुढच्या काळात जुने कार्यकर्ते आणि आयात नेते यांना टिकविण्यामध्ये नेतृत्वाचा कस लागणार आहे.

पाच वर्षांपूर्वी शिवसेना भाजपची सत्ता आली. चंद्रकांत पाटील यांना एकापेक्षा एक महत्त्वाची खाती मिळत गेली. मुख्यमंत्रिपदासाठीचे पर्यायी नेतृत्व अशी त्यांची प्रतीमा झाली; परंतु हे होत असताना आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील हे त्यांच्याशी आणि त्यांच्या पक्षाच्या धोरणांशी संघर्ष करत राहिले.

शिवसेना आणि भाजप सत्तेत असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातही या दोघांचे फारसे सख्य नव्हते; परंतु युतीधर्मामुळे प्रचार प्रारंभ, सभा, मेळावे एकत्र घेतले जात होते. मुश्रीफ, सतेज पाटील यांच्या सहकार्यातून खासदार झालेले संजय मंडलिक यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात भूमिका घेतली.नुक त्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या जागा पाडण्याच्या नादात शिवसेना आणि भाजपचे जबर नुकसान झाले; मात्र मुश्रीफ, पाटील, मंडलिक यांची खेळी यशस्वी झाली. आता पुन्हा हाच ‘कोल्हापूर पॅटर्न’, ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत राज्यात सत्तेवर आला आहे. गेले महिनाभर सत्तासंघर्ष सुरू असताना अचानक अजित पवार यांच्या साथीने देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता संपादनाचा केलेला खेळ अंगलट आला.

आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेचे तीव्र पडसाद जिल्ह्याच्या राजकारणामध्ये उमटणार यात शंका नाही. सध्या १0 पैकी पी. एन. पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ॠतुराज पाटील हे चार आमदार काँग्रेसचे, हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील हे दोघे राष्ट्रवादीचे आणि प्रकाश आबिटकर हे एकमेव शिवसेनेचे आमदार आहेत. जनसुराज्यचे एकमेव आमदार विनय कोरे आणि अपक्ष प्रकाश आवाडे यांनी आधीच भाजपला पाठिंबा दिला आहे, तर राजेंद्र्र पाटील- यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

राज्यातील या सत्तांतरानंतर खासदार संजय मंडलिक यांच्या सहकार्याने हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील जिल्ह्यातील राजकारणामध्ये धमाके उडविणार हे निश्चित आहे. त्याची सुरुवात जिल्हा परिषदेतूनच होणार आहे. त्यानंतर एप्रिल २0२0 मध्ये जिल्ह्यातील सर्वांत शक्तिमान अशा ‘गोकुळ’ची निवडणूक आहे. याच निवडणुकीत महादेवराव महाडिक यांना वगळून आघाडी करण्यासाठी मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील यांच्यावर दबाव आणू शकतात.

येत्या पंधरवड्यामध्ये बाराही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड आहे. आत्ताच १२ पैकी ९ पंचायत समित्यांचे सभापती हे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आहेत. तेथेही हे नेते जातीने लक्ष घालणार यात शंका नाही. पाच वर्षे सत्तेच्या बाहेर राहून संघर्ष करत राहिलेले हे दोन्ही नेते पुन्हा एकदा जिल्ह्याच्या सत्तेवर पक्की मांड ठेवण्यासाठी पावले उचलणार यात शंका नाही. 

  • कार्यकर्ते टिकविण्याचे भाजपसमोर आव्हान

जिल्ह्यात भाजप वाढविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी अनेकांना भाजपमध्ये घेतले. यातील अनेकांना महामंडळे जाहीर केली. ज्याची अधिकृत पत्रेही अनेकांना मिळाली नाहीत; मात्र विधानसभेवेळी समरजितसिंह घाटगे यांच्यापासून अशोक चराटी, अनिल यादव, अशोक राव माने, अशी अनेक मंडळी भाजपपासून दूर झाली. नव्यांच्या भरण्यामुळे दुखावलेले भाजपचे जुने कार्यकर्ते आणि नाळ न जुळलेले नवे कार्यकर्ते या सगळ्यांनाच सत्ता नसताना टिकविण्याचे आव्हान आता भाजप नेतृत्वासमोर असेल. 

  • महाडिकांचा कस लागणार

केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे; त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता भाजप सहजासहजी सोडणार नाही, अशी सर्वांची अटकळ होती. त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि महाडिक परिवारालाही दिलासा मिळाला. लोकसभा, विधानसभेच्या पराभवानंतरही राज्यात सत्ता आली तर किमान पाठबळ असेल, असे सर्वांनाच वाटत होते; मात्र फडणवीस सरकार कोसळले आणि महाडिकांच्याही यापुढच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाडिक यांचा प्रत्येक तालुक्यात गट आहे म्हणूनच त्यांना चंद्रकांत पाटील यांनी थेट राज्य उपाध्यक्ष पद दिले; त्यामुळे यांचा आणि बंधू अमल महाडिक यांचाच आता खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. राज्यात सत्ता नसताना भाजप टिकविण्यासाठी जबाबदारी त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना पेलावी लागणार आहे.

  • मंडलिक, माने, आबिटकर यांच्यावरही जबाबदारी

ज्या जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार होते. त्याच जिल्ह्यात पाच उमेदवार पराभूत झाले; त्यामुळे शिवसेनेला बळ देण्यासाठी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर यांना अधिक सक्रिय व्हावे लागणार आहे. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरBJPभाजपाPoliticsराजकारण