शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

कोल्हापूर :  वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 1:45 PM

वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्दे वीज दरवाढीविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार१५ फेब्रुवारीपूर्वी राज्यव्यापी बैठक; जागर फौंडेशनतर्फे परिसंवाद

कोल्हापूर : वीज दरवाढ कमी करण्यासाठी एकजुटीने तीव्र लढा देण्याचा निर्धार जागर फौंडेशनतर्फे आयोजित वीज दरवाढविरोधी राज्यस्तरीय परिसंवादामध्ये उद्योजक, शेतकरी, आदी घटकांच्या वतीने करण्यात आला. वीज दरवाढ तत्काळ कमी करावी; उद्योगक्षेत्रासाठी वीज अनुदान द्यावे, या मागण्यांची पूर्तता होईपर्यंत लढा देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमधील मिनी सभागृहात राज्यस्तरीय परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे होते. या परिसंवादात वीजतज्ज्ञ, विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधी सहभागी झाले. वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, राज्य सरकारने ३४०० कोटींची तातडीची मदत म्हणून अनुदान देण्याची गरज आहे. तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने अशा पद्धतीने तातडीची मदत म्हणून सहा हजार कोटींचे अनुदान दिले होते. वीजनिर्मिती, खरेदी, गळती आणि प्रशासकीय खर्चात कपात जर केली नाही, तर महावितरण भविष्यात निश्चित बंद पडेल. वीज दरवाढीविरोधात राज्यव्यापी लढ्याची दिशा ठरविण्यासाठी दि. १५ फेब्रुवारीपूर्वी सर्व जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजकांची बैठक घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले, वीजदरवाढीबाबतच्या लढ्यात माझा पूर्ण ताकदीने सहभाग राहील. सरकारला वीजदर कमी करावाच लागेल. ‘कोल्हापूर चेंबर’चे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, डिमांड चार्जेस कमी व्हावेत. वीज दरवाढीमुळे उद्योग चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. उद्योगमंत्र्यांनी दरवाढीचा फेरविचार करावा.

अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, वीजदरवाढ मागे घेण्यासाठी आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. त्या दृष्टीने सर्व घटकांनी संघटित होऊन लढा उभारण्याची गरज आहे. ‘जागर फौंडेशन’चे अध्यक्ष प्रा. बी. जी. मांगले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी वीजदरवाढ मागे घेण्यासाठी उद्योजक, शेतकरी, व्यावसायिक, आदी घटकांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे. या लढ्यात ‘जागर फौंडेशन’ सहभागी राहील.

या परिसंवादात ‘कोल्हापूर चेंबर’चे माजी अध्यक्ष आनंद माने, ‘गोशिमा’चे राजू पाटील, ‘मॅक’चे हरिश्चंद्र धोत्रे, निवृत्त कार्यकारी अभियंता तुकाराम भिसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पारस ओसवाल, अरुण पाटील, गुलाबराव घोरपडे, रमेश पोवार, बाबासाहेब देवकर, प्रसाद बुरांडे, गोपाळ पटेल, नंदकुमार गोंधळी, सचिन तोडकर, अप्पासाहेब धनवडे, चंद्रकांत कांडेकरी, रितू लालवाणी, आदी उपस्थित होते. पीटर चौधरी यांनी प्रास्ताविक केले. सम्राट गोंधळी यांनी आभार मानले.कोण, काय, म्हणाले?

  1. आनंद माने (कोल्हापूर चेंबर) : शेतीला वीजपुरवठा करण्यासाठी अधिक खर्च होत असल्याचे सांगून महावितरणकडून वीज दरवाढ केली जात आहे. या दरवाढीमुळे उद्योग चालविण्याची कसरत करावी लागत आहे. शेजारील राज्यांच्या बरोबरीने आपल्या राज्यात वीजदर असणे आवश्यक आहे.
  2. राजू पाटील (स्मॅक) : महावितरणने पॉवर फॅक्टर पेनल्टीचा भार उद्योजक आणि ग्राहकांवर लादू नये. वीज दरवाढ मागे घ्यावी.
  3. उज्ज्वल नागेशकर (हॉटेल मालक संघ) : हॉटेल व्यवसायाला इंडस्ट्रीचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार वीजदर लागू करणे, सवलती, अनुदान देणे आवश्यक आहे.
  4. विक्रांत पाटील (इरिगेशन फेडरेशन) : शेतकरी, उद्योजकांचे म्हणणे ऐकत नसेल, तर वीज नियामक आयोगाची आम्हाला गरज नाही.
  5. कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात वीजगळती कमी असून बिलाची वसुली अधिक आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यांतील तोटा भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्राला वेठीस धरले जात आहे. ऊर्जामंत्र्यांचा पश्चिम महाराष्ट्रावर राग आहे.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर