शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

कोल्हापूर : आंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2018 12:34 PM

केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआंबेओहोळच्या २२७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरीपालकमंत्र्यांचा पाठपुरावा, प्रकल्पाला मिळणार गती

कोल्हापूर : केवळ १५ टक्के कामासाठी रखडलेल्या आजरा तालुक्यातील उत्तूर परिसरातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या २२७ कोटी ५४ लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील सिंचनक्षेत्र वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेला हा प्रकल्प आजरा तालुक्यातील आर्दाळ, पेंढारवाडी, करपेवाडी या गावांजवळ आंबेओहोळ नाल्यावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर पद्धतीचे सात बंधारे बांधण्यात येत आहेत.

या माध्यमातून आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यांतील ३९२५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आतापर्यंत या प्रकल्पाच्या मातीच्या धरणाचे ८० टक्के, पुच्छ कालव्याचे ८० टक्के काम; तर विद्युत विमोचकाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे; परंतु अद्याप प्रकल्पाची घळभरणी झालेली नाही.या प्रकल्पासाठी मूळ प्रशासकीय मान्यता आॅक्टोबर १९९८ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली सुधारित प्रशासकीय मान्यता जानेवारी २०१० मध्ये घेण्यात आली. प्रकल्पाची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने व्यय अग्रक्रम समितीसमोर सादर केला होता. कामांचा प्राधान्यक्रम ठरवून निविदा प्रक्रिया सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येणार असल्याने पुढील वर्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आग्रह धरला जाणार आहे.

जमिनीसाठीच्या रकमेचा प्रस्तावामध्ये समावेशया प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्यांना ज्या जमिनी द्यावयाच्या आहेत, त्यांना पाहिजे असल्यास रोख रक्कमही दिली जाणार आहे. त्याचीही तरतूद या सुधारित प्रशासकीय मंजुरीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे जमीनवाटपाचा मुद्दा निकाली निघण्याची शक्यता आहे.

अन्य प्रकल्पांचे काय?या प्रकल्पाबरोबरच आजरा तालुक्यातील उचंगी प्रकल्प केवळ ४० कोटी रुपयांसाठी रखडला आहे. तसेच याच तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील सर्फनाला प्रकल्पाचेही काम रखडले आहे. राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाचे कामही सुरू झालेले नाही. या प्रकल्पांबाबतही आता युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागणार आहेत. 

टॅग्स :Chandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटीलkolhapurकोल्हापूर