शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोल्हापूर : अबब, वाकरे गावात नागिणीला २१ पिल्ले, पोर्लेकरांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:04 IST

सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारा साप बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर्पमित्रांना बोलावून नागिणीसह अंड्यांना जीवदान दिले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील तुकाराम कर्पे यांच्या कुटूंबाने वन्यजीवाबाबत दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देपिलांचा जन्म होताच वनक्षेत्रात सुखरुप पोहोचविलेसर्पमित्र दिनकर चौगुले यांनी केली मदत

सरदार चौगुलेकोल्हापूर /पोर्ले तर्फ ठाणे : सकाळची वेळ...गेले दोन महिने घराभोवती शत्रूसारखा घिरट्या घालणारी नागिण बिळात गेल्याचे त्यांनी पाहिले..आणि त्याला मारण्याच्या इराद्याने, त्यांनी बिळात डोकावून पाहिलं तर त्या सापाजवळ अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांच्यातील माणुसकीला पाझर फुटला आणि सर्पमित्रांना बोलावून नागिणीसह अंड्यांना जीवदान दिले. करवीर तालुक्यातील वाकरे येथील तुकाराम कर्पे यांच्या कुटूंबाने वन्यजीवाबाबत दाखवलेल्या कृतज्ञतेचे कौतुक होत आहे.सापाच्या जातीतील किंग कोब्राचाअपवाद सोडला तर सर्वसामान्य सर्वच साप निसर्गाच्या पोषक वातावरणात अंडी घालून निघून जातात ; परंतू वाकरे येथे शेतवाडीत राहणाऱ्या तुकाराम वर्पे यांच्या घराजवळ गेले दोन महिने सापांच्या अंड्याजवळ राहणाऱ्यां एका नागिणीने पिलांचे संरक्षण कवच बनून पहारा देत या समजूतीला धक्का दिला आहे.सोमवारी सकाळी ती नागिण बिळात शिरताना वर्पे यांना दिसली. मुलगा संदिपने बॅटरीच्या उजेडात बिळात डोकावले तर त्या नागिणीशेजारी अंड्यांची चुंबळ दिसली. मग मात्र त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवत पोर्ले तर्फ ठाणे (ता.पन्हाळा) येथील सर्पमित्र दिनकर चौगुले, विवेक चौगुले, कृष्णात सातपुते, अभिजीत पाटील (जाफळे) यांना पाचारण केले. त्यांच्या मदतीने त्या नागिनीसह एकुण २१ अंडी बिळातून बाहेर काढण्यात आले.

अंडी बाहेर काढताना अंड्यांच्या कवचातून बुडबुडे बाहेर येत असल्याचे जाणवत होते. पिलांचे दिवस भरल्याने पोर्ले येथील सर्पमित्रांनी अंडी उबवण्यासाठी विशिष्ट वातावरण निर्मिती केली आणि दोन दिवसात ती अंडी उबवू देऊन पिल्लांचा निपज केला.सर्पमित्रांनी नागिणीसह या २१ पिलांना पन्हाळ्याचे वनरक्षक ईश्वर जाधव, वनमजूर तानाजी लव्हटे यांच्या साक्षीने सुरक्षित वनक्षेत्रात सोडून दिले.अन्नसाखळीचा असाही अनुभव...कॉमन कोब्रा (नाग) वर्षातून एकदा अंडजद्वारे पिलांना जन्म देतात. मार्च महिन्यात साप अंडी घालतात. त्यानंतर अंडी उबवायला ५५ ते ६० दिवसाचा कालावधी लागतो. मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात विशिष्ट वातावरणात अंडी ऊबवून पिल्ली बाहेर पडतात. पावसाळ्याच्या सुरूवातीला सापांच्या पिल्लांची निपज होते लहान बेडकांसह अन्य भक्षकांची निपजही याच दरम्यान होते. त्यामुळे लहान सापांच्या भक्ष्याचा प्रश्न निसर्गच मिटवितो. निसर्ग चक्रातील अन्नसाखळीचे हे जिवंत उदाहरण आहे.

वन्यप्राणी व पशूपक्षी लहान पिल्लांचे मोठे होईपर्यंत संगोपन करतात आणि त्यानंतरच त्याला मनसोक्त फिरण्यासाठी सोडून देतात. परंतू सर्वसामान्य सापाच्यांत (अपवाद किंग कोब्रा) अंड्याजवळ थांबून ती उबवण्याची पध्दतच नाही; परंतू वाकरे येथील अंड्याजवळ थांबलेल्या या नागिणीने दोन महिने थांबून मातृत्व सिध्द केले आहे.दिनकर चौगुले,सर्पमित्र, पोर्ले तर्फ ठाणे 

टॅग्स :environmentवातावरणkolhapurकोल्हापूरforestजंगल