शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

pension day : पेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 2:21 PM

आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.

ठळक मुद्देपेन्शनसाठीही केएमटी कर्मचाऱ्यांच्या पदरी संघर्षतुटपुंज्या पेन्शनवर उदरनिर्वाह करायचा कसा : संतप्त कर्मचाऱ्यांचा सवाल

कोल्हापूर : आयुष्यातील २५ ते ३0 वर्षे संस्थेसाठी प्रामाणिकपणे काम करायचे आणि उतारवयात दुसऱ्यावर अवलंबून राहायचे, अशी स्थिती केएमटीमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची झाली आहे. कामावर असताना दर महिन्याच्या पगारासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजविल्या. सेवानिवृत्तीनंतर पेन्शनसाठीही त्यांच्या पदरी संघर्ष आला आहे.महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी दर महिन्याला १0 तारखेची प्रतीक्षा करावी लागते. येथील कर्मचाऱ्यांना समाधानकारक पेन्शन आहे; मात्र केएमटी कर्मचाऱ्यांची वाईट स्थिती आहे. केवळ ८00 ते २५00 रुपये पेन्शनवरच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. ही पेन्शन सुरू होण्यासाठी दोन ते तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. तसेच संबंधितांचे हात ओले केल्याशिवाय पेन्शनची फाईल पुढे सरकत नाही.कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची पेन्शन वेळेवर होत नाही. याबद्दल सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने तत्कालीन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची भेट घेतली. त्यांनी १ तारखेलाच पेन्शन देण्याचे आदेश दिले होते. काही महिने १ तारखेला पेन्शनही झाली. त्यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा नियम कागदावरच राहिला.

महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने पेन्शन वेळेवर होत नाही. १0 तारखेपर्यंत प्रतीक्षा करण्याची वेळ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर येत आहे. वास्तविक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना औषध उपचारासाठी पैशाची गरज असते. दुसऱ्यांकडे पैसे मागण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे; त्यामुळे पूर्वीप्रमाणे १ तारखेलाच पेन्शन मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे.केएमटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शनकेएमटीच्या कर्मचाऱ्यांचा त्रास सेवानिवृत्तीनंतरही संपत नाही, अशी स्थिती आहे. कामावर असताना वेळेवर पगार नसल्यामुळे सावकाराच्या दारात जाण्याची वेळ त्यांच्यावर येत आहे, तर सेवानिवृत्तीनंतर ८00 ते २५00 रु. पेन्शन मिळते. तुटपुंज्या पेन्शनमुळे दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. वास्तविक पगाराएवढी पेन्शन देण्याचा निर्णय झाला असताना याची अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर उतारवयातही संघर्ष सुटलेला नाही.

 

  • महापालिकेचे सेवानिवृत्त कर्मचारी- सुमारे ३000
  • केएमटी- एक हजार
  • केएमटी कर्मचाऱ्यांना पेन्शन-८00 ते २५00 रु.

पगाराएवढी पेन्शन मिळाली पाहिजे

केएमटी कर्मचाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच पेन्शन मिळाली पाहिजे. पेन्शन वाढीचा प्रस्ताव केंद्रीय पातळीवर मंजूर होऊनही अंमलबजावणी होत नाही. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्वरित पेन्शन सुरू होत नाही. तीन वर्षांनंतर पेन्शन सुरू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. पगाराएवढी पेन्शन मिळालीच पाहिजे.सुभाष सावंत, केएमटी सेवानिवृत्त कर्मचारी 

 

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतनkolhapurकोल्हापूर