शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काळम्मावाडी गळती दुरुस्ती प्रक्रिया अडकली आचारसंहितेत, निधी मंजूर तरीही कामाला ‘खो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 13:38 IST

निवडणुकीनंतर मिळणार गती 

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण असलेल्या काळम्मावाडी (दूधगंगा) धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या प्रक्रियेला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आड आली आहे. या कामाची निविदा यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात मुंबईत बैठक होणार होती, परंतु काही कारणांमुळे ही बैठक झालीच नाही. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली, त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मंजूर निधीच्या कामाला ‘खो’ बसला आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे.जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले, शिरोळ, कागल आणि भुदरगड तालुक्यांतील १२१ गावांमधील ४६ हजार ९४८ हेक्टर क्षेत्राला काळम्मावाडी धरणातून पाणीपुरवठा होतो. २५.३९ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या या धरणातून कर्नाटक राज्यालाही ४ टीएमसी पाणी दिले जाते. परंतु या धरणातून रोज ३५० लिटर प्रतिसेकंद पाण्याची गळती सुरू आहे. त्यामुळे २०२२ मध्ये हे धरण ७५ टक्के भरले होते. गळती काढण्यासाठी धरणाच्या काही भागात दुरुस्ती करण्यात येणार आहे. याकरिता राज्य सरकारने ८० कोटी रुपयांचा निधी ऑक्टोबर २०२३ मध्येच मंजूर केला आहे. ही गळती काढण्यासाठी निधी मंजूर झाल्यानंतर प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला. मात्र, या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ही मुदत १३ मार्चला संपली आहे.या निविदांचे तांत्रिक मूल्यांकनही पूर्ण झाले आहे. मात्र, मुख्य अभियंता यांच्याकडून मान्यताही मिळालेली आहे. मात्र, व्यावसायिक निविदा बाकी आहे. या गळती दुरुस्तीचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. या सर्व प्रक्रियेला वेळ लागणार असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच गळतीची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकारी धडपडत होते. मात्र, आता निवडणुकीच्या निकालानंतर या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणCode of conductआचारसंहिता