शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग काय अमित शाह येताहेत का इंडिया आघाडीत?, आम्ही त्यांना पंतप्रधान करतो : संजय राऊत
2
Amit Shah : Video - "तीन टप्प्यात भाजपाने किती जागा जिंकल्या?"; अमित शाह यांची 'भविष्यवाणी'
3
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
4
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
5
देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्राला 'उबाठा'चीही मान्यता; भाजपाचा हल्लाबोल 
6
भारतामध्ये ६५ वर्षांत हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली, अहवालावरून खळबळ, भाजपा-कांग्रेसचे आरोप प्रत्यारोप   
7
WhatsApp कॉल आता आणखी सोपे होणार! नवीन फीचर कॉल मॅनेजमेंटला सुपरफास्ट बनवणार
8
अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ! दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडी मोठं पाऊल उचलणार
9
देसी सुपरस्टार मनोज वाजपेयींच्या 'भैय्याजी'चा अ‍ॅक्शनपॅक ट्रेलर भेटीला
10
अक्षय्य तृतीया: कर्माचे श्रेष्ठत्व सांगणारे, आद्य समाजसुधारक, संत महात्मा बसवेश्वरांची जयंती
11
IPL 2024: लखनौच्या फ्रँचायझीने पोलिसांचे १० कोटी रूपये थकवले; एका सामन्याची फी आहे...
12
दमदार इंजिन अन् शानदार मायलेज; लॉन्च झाली नवीन मारुती Swift, जाणून घ्या किंमत...
13
१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी अमोल किर्तीकरांच्या प्रचारात?; Video व्हायरल
14
KL Rahul ला झापणाऱ्या संजीव गोएंका यांनी MS Dhoni लाही अचानक कर्णधारपदावरून हटवले होते... 
15
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
16
Go Digit IPO : १५ मे पासून खुला होतोय 'हा' IPO, ग्रे मार्केटमध्ये तुफान तेजी; Virat Kohli ची आहे गुंतवणूक
17
अक्षय्य तृतीया: ‘असे’ कसे करा पूजन; पाहा, शुभ मुहूर्त, अद्भूत योग, महत्त्व अन् मान्यता
18
धक्कादायक! भाजपा सदस्याच्या अल्पवयीन मुलाने केलं मतदान; FB वर पोस्ट केला व्हिडीओ
19
Jupiter Wagons Share Price : रेल्वेसाठी काम करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी; ८ रुपयांवरुन ४०० पार, नफा वाढला
20
...आता महाराष्ट्राचा शाप काय असतो तो मोदीजींनी अनुभवावा; उद्धव ठाकरेंचा इशारा

Kolhapur: काळम्मावाडी धरण गळती प्रस्ताव लालफितीत, पावसाळ्यानंतर काम शक्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 4:07 PM

निविदेच्या टप्यातच शासनाकडून दिरंगाई

कोल्हापूर : काळम्मावाडी (दूधगंगा) धरणातील गळती काढण्याची निविदा निश्चितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या टप्प्यात प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. त्याला मंजुरी मिळून वर्क ऑर्डर देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्यास विलंब लागणार आहे. तोपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी येत्या पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे पाटबंधारे प्रशासनाच्या सूत्राकडून सांगण्यात आले.राधानगरी तालुक्यात असणाऱ्या काळम्मावाडी धरणात २५.४० टीएमसी पाणीसाठा करता येतो. मात्र, दगड-मातीच्या असणाऱ्या या धरणाच्या पायामध्येही प्रचंड गळती आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरू शकत नाही. धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणाची गळती काढण्यासाठी जलसंपदा विभागाने ८० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. धरणावर जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यामुळे हे धरण जिल्ह्यातील समृद्धीसाठी महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या धरणाच्या गळती काढण्यासाठीच्या कामाला निधी मिळवण्यासाठी शासकीय पातळीवर वजन वापरले. मात्र, निविदा निश्वित होऊन वर्कऑर्डर मिळण्याच्या प्रक्रियेत हा प्रस्ताव शासकीय पातळीवर लालफितीत अडकला. परिणामी तातडीने काम सुरू होणार नाही. आता लोकसभेची आचारसंहिता सुरू आहे. वर्कऑर्डर मिळाले तरी आचारसंहिता संपेपर्यंत गळतीच्या कामाचा प्रारंभ होणार नाही. ही सर्व प्रकिया पूर्ण होईपर्यंत जून महिना उजाडणार आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर गळतीचे काम करणे अडचणीचे ठरणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यानंतर कामाला सुरुवात होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरण