शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

कळंबा तलावाचे साडे सात कोटींचे सुशोभीकरण ‘अंधारात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 20:59 IST

१३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलावाचे सौंदर्य साडे सात कोटींच्या सुशोभीकरनाच्या कामाने खुलले आहे. परंतु सुशोभीकरनाचे काम करणाºया निविदा धारक कंपनीने तलाव परिसरात पथदिवे न लावल्याने सारे सुशोभीकरणच रात्रीच्या अंधारात गडप झाले आहे.

ठळक मुद्देपरिसराचा गैरवापर; कोट्यवधी पाण्यातपथदिवे बसवून नागरिकांची गैरसोय दूर करावी ही मागणी

- अमर पाटील-

कळंबा : १३६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या कळंबा तलावाचे सौंदर्य साडे सात कोटींच्या सुशोभीकरनाच्या कामाने खुलले आहे. परंतु सुशोभीकरनाचे काम करणाºया निविदा धारक कंपनीने तलाव परिसरात पथदिवे न लावल्याने सारे सुशोभीकरणच रात्रीच्या अंधारात गडप झाले आहे. तलावाची मालकी असणारे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या प्रश्नी दुर्लक्ष झाले त्यामुळे निविदा धारक कंपनीने पथदिवे लावलेच नाहीत विरंगुळा मनशांती व व्यायामासाठी येणाºया नागरिकांना याचा प्रचंड मनस्ताप होत असून सुशोभीकरण केलेल्या परिसरात रात्री दारूच्या पार्ट्यांचा महापूर उसळला असून प्रेमीयुगलांनी उच्छाद मांडला आहे साडे सात कोटींचे सुशोभीकरण रात्र होताच अंधारात गडप होते व रात्रीचे खेळ सुरू होतात

एकीकडे पिण्याच्या पाण्याच्या तलावाचा वापर आता आत्महत्या केंद्र म्हणून वाढत आहे तलावातील पाण्यासह ,सुशोभीकरण परिसराची सुरक्षा हा संवेदनशील विषय असून निव्वळ पथदिवे नसल्याने आज सारेच अंधारात चाचपटत आहेत लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र याप्रश्नी फारसे गंभीर नाही पालिका जैवविविधता समिती पर्यावरण तज्ज्ञांनी याप्रश्नी आवाज उठवून ही त्यांची हाक प्रशासनास आजअखेर ऐकू गेली नाही वैशिष्ट्य म्हणजे तलावावर एकही कायम स्वरूपी कर्मचारी पालिकेने नियुक्त केला नाही शाहू कालीन ठेव्याविषयी प्रशासनास काहीही सोयरेसुतक नाही तलावाच्या प्रवेशद्वारा पासुन सांडव्या पर्यंत पूर्वी पथदिवे होते. लोखंडी संरक्षक कठडा मोडलेल्या धोकादायक मनो?्या लगतही पथदिवे होते सुशोभीकरण करणा?्या निविदाधारक कंपनीने हे पथदिवे उध्वस्त केले पण नवीन पथदिवे सुद्धा लावले नाहीत.

आज तलाव परिसरात सुशोभीकरण कामा अंतर्गत अडीच किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक, शंभर मीटर व्यासाचे प्रवेशद्वार जनावरे धुण्याचा हौद दहा लाखांची ओपन जिम आदी सुविधा उपलब्ध असल्याने महिला युवती व जेष्ठ नागरिकांची संध्याकाळी मोठी गर्दी असते संध्याकाळ नंतर पथदिवे नसल्याने हा परिसर फिरायला येणा?्या नागरिकांसाठी सुरक्षित राहात नाही तलावा समोर करवीर पोलिसस्टेशनची पोलिसचौकी उभा असूनही दारूच्या व मटणाच्या जेवणावळी प्रेमीयुगलांचे चाळे व टवाळखोरांचा उच्छाद यामुळे नागरिक अस्वस्थ आहेत तलाव परिसरात सुरक्षिततेसाठी नियोजित सिसिटी कॅमेरेही बसवले गेले नसल्याने सुरक्षिततेचा तिसरा डोळाही गायब आहे

आज निधीअभावी सुशोभीकरण रखडले आहे तर दोन वर्षांपूर्वी निविदा धारक कंपनी गाशा गुंडाळून निघून गेली आहे किमान पालिका प्रशासनाने तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरणा?्या कळंबा पाचगाव ग्रामपंचायत प्रशासनाने सामाजिक संस्था दानशूर व्यक्ती यांनी पुढाकार घेऊन पथदिवे बसवून नागरिकांची गैरसोय दूर करावी ही मागणी जोर धरत आहे.

 सापांचा सुळसुळाटतलाव परिसर गर्द झाडीने बहरला असून निविदा धारक कंपनीने परिसरात चार हजार वृक्षांचे उध्यान उभा केले आहे रात्री विषारी व बिनविषारी सापांचा सुळसुळाट पसरला असून पथदिवे नसल्याने सारे धोकादायक बनले आहेफोटो - संग्रहीत कळंबा तलावाचा फोटो वापरावा

टॅग्स :Damधरणkolhapurकोल्हापूर