शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणात कुणाला पाठिशी घालणार नाही, मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही 

By समीर देशपांडे | Updated: February 11, 2023 19:08 IST

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता म्हणाले, उत्तरही देण्याची गरज नाही

कोल्हापूर : पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणामध्ये मी स्वत: लक्ष घातले आहे. हा लोकशाहीवरचा हल्ला असून कोणत्याही परिस्थितीमध्ये यातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापुरातील कणेरी येथील सिध्दगिरी मठावर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही ग्वाही दिली.शिंदे म्हणाले, ही घटना घडली त्याच दिवशी मी जिल्हा पोलिस प्रमुखांशी बोललो आहे. पत्रकार आपला जीव धोक्यात घालून चुकीचं होत असेल ते किंवा जे चांगले होते ते जनतेपर्यंत पोहोचवत असतात. त्यामुळेच त्यांच्यावरचा हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना कोणीही पाठीशी घालता कामा नये. कठोरात कठोर शिक्षा केली जावी याबद्दल कोणाचेच दुमत असणार नाही. याबाबत योग्य सुचना दिल्या आहेत.याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटबाबत विचारले असता ते म्हणाले, मला राजकारणात जायचे नाही. याचे उत्तरही देण्याची गरज नाही. परंतू कोणाशीही पाठीशी घातले जाणार नाही असे शिंदे यांनी स्पष्ट केले.'...तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं'या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. पत्रकारांचीही अवस्था अशी झाली असेल तर राज्य कोणत्या दिशेने चाललंय, हे समजून घ्यावं, असं शरद पवार म्हणाले. तसेच पत्रकार वारिसे प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJournalistपत्रकारDeathमृत्यूChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे