शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

शिवरायांना अभिप्रेत सर्वसमाजाचा विकास आता अपेक्षित :शाहू छत्रपती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 5:14 PM

काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : काळ बदलत असून नवीन ऊर्जा निर्माण होत आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारा सर्वसमाजाचा विकास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन शाहू छत्रपती यांनी रविवारी येथे केले. याच कार्यक्रमात शिवाजी चौक सुशोभिकरणाचे काम येत्या पाच महिन्यात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील असे सांगून पुढील टप्प्यात येथे आनंदोत्सव केंद्र उभारले जाईल, असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरणाच्या भूमीपूजन पायाभरणी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर हसिना फरास होत्या. प्रमुख उपस्थिती आमदार राजेश क्षीरसागर, उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक ईश्वर परमार, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे यांची होती.

आ.क्षीरसागर यांच्या पुढाकाराने सुशोभिकरणासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले.

दरम्यान सकाळी नऊ वाजता बिंदू चौक येथून जिल्ह्यातील ३३ गडकिल्लयांवरील पाणी, दगड, माती व तालीम संस्थांमधील माती तसेच जिल्ह्यातील १६ नद्यांमधील पाण्यांच्या कलशांची लेझीम, ढोलताशा, धनगरी ढोल अशा पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सेवक दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन, शिवप्रतिष्ठानतर्फे शिवप्रेरणा मंत्र, मान्यवर महिलांच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध व जलाभिषेक करण्यात आला.

शाहू छत्रपती म्हणाले, शिव-शाहूंचे विचार हे लोक हिताचे असल्याने ते चिरंतन असून संपूर्ण देश हे विचार पुढे नेत आहे. निव्वळ जय भवानी...जय शिवाजी...च्या घोषणा देऊन चालणार नाही तर समाजोपयोगी काम प्रत्येकाने हाती घेण्याची गरज आहे. आ. क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून पुतळा सुशोभिकरणाचे ऐतिहासिक काम होत आहे.

आ. क्षीरसागर म्हणाले, शिवाजी चौक पुतळा सुशोभिकरणाचे काम सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन केले जात आहे. हे काम पाच महिन्यात पूर्ण करणाचा प्रयत्न आहे. हा पुतळा देशातील क्रमांक एकचा होईल. यासाठी एक कोटी रुपयांचा निधी महापालिकेकडे सुपुर्द करण्यात आलेला आहे. 

ते पुढे म्हणाले, पुढील टप्प्यात शिवाजी चौक परिसरात शिवरायांच्या काळातील विविध शिल्पे बसवून एक आनंदोत्सव केंद्र (सेलिब्रेशन सेंटर) उभारण्यात येणार आहे.

महापौर फरास यांनी पुतळा सुशोभिकरणाच्या कामासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल क्षीरसागर यांना धन्यवाद दिले.

यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी उपमहापौर उदय पोवार यांनी मनोगत व्यक्त केले.

शपथ आहे तुम्हाला...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पवित्रता जपण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. त्यामुळे कोणीही दारु पिऊन अथवा गुटखा, मावा खाऊन या पुतळ्याच्या कठड्याला स्पर्श करु नये, अशी शपथ आ. क्षीरसागर यांनी घातली.  (छाया : दीपक जाधव)

टॅग्स :kolhapurकोल्हापूर