शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

पोलीस उद्यान रसिकांनी बहरले; देशभरातील कलावंतांची मांदियाळी - अभिजात भारतीय कलेचा आविष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 1:33 AM

महोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला एकाच परिसरात घडत असल्याने प्रत्येक कलाकृती नावीन्याची अनुभूती देणारी आहे. यासह आर्किटेक्टनी बनवलेल्या डिझाईन्सही येथे मांडण्यात आले आहेत.

ठळक मुद्देकलाब्धि महोत्सवास प्रारंभ।

कोल्हापूर : अभिजात भारतीय कलाविष्कारानेकलाब्धि आर्ट फेस्टिव्हलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला. देशभरातील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. लघुचित्र शैली, वारली पेंटिंग, निसर्गचित्र, अ‍ॅक्रॅलिक, शिल्पकला, टेराकोटा, कागदकाम, क्लॉथ पेंटिंग, हस्तकला, मांडणी शिल्प, मंदिर स्थापत्य शैली या कलांचे वैश्विक रूप यानिमित्ताने उलगडले.

महोत्सवाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेंद्र जैन, अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रीमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे उपस्थित होते. भारतीयत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.

यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, सहा महिला आपलं कुटुंब, करिअर सांभाळून कलेच्या उत्कर्षासाठी अशा प्रकारचा देशपातळीवरील महोत्सव आयोजित करतात, ही कौतुकाची बाब आहे. पोलीस उद्यानासारख्या ठिकाणी कलेचा महोत्सव भरल्याने या परिसरालाही देखणे रूप आले आहे. कलात्मकतेने भारलेल्या वातावरणात मन सुखावून जाते. देशभरातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यापुढेही या परिसरात कलांचा मुक्त आविष्कार घडावा.

यानंतर उद्यानाच्या हिरवळीत आणि झाडांच्या आच्छादनात भारतीय कला-परंपरा आकाराला येऊ लागला. देशातील विविध भागातून आलेले कलावंत आपली कला या कलानगरीच्या रंगमंचावर सादर करीत होते. मिनी आर्ट रसिकांना अचंबित करायला लावणारे होते. तर शिल्पकलेतून कलावंत भारतीयत्व ही संकल्पना घेऊन कलाकृती घडवत होते. अहिंसेचा संदेश देणा-या महात्मा गांधींच्या काठीपासून ते भारताचे वैविध्य रूपांचे दर्शन घडवणारे, लेकुरवाळी विठूमाउली, प्राणी, व्यक्तिशिल्प नजर खिळवून ठेवणारे होते. दुसरीकडे कागदकामची कार्यशाळा सुरू होती. एकीकडे शालेय विद्यार्थी मांडणी शिल्प करण्यात गुंतले होते.

अमृता जनवाडकर यांनी कलाब्धिच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ग्रीष्मा गांधी यांनी महोत्सवाची मांडणी, नेपथ्याची रचना पर्यावरण संवर्धनाचा उद्देश ठेवून केली असल्याचे सांगितले. मानवी कामत यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर शिल्प स्पर्धा, शालेय मुलांचे मांडणी शिल्प, छायाचित्रण स्पर्धा अशा स्पर्धा झाल्या.

तीळ आर्ट ते फाईन आर्टमहोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला एकाच परिसरात घडत असल्याने प्रत्येक कलाकृती नावीन्याची अनुभूती देणारी आहे. यासह आर्किटेक्टनी बनवलेल्या डिझाईन्सही येथे मांडण्यात आले आहेत.

इको फ्रेंडली नेपथ्यपर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते रंगमंचामागील पडदा, उद्यानाची सजावट हे सगळे नेपथ्य इको फ्रें डली वस्तूंपासून करण्यात आले होते.नारळाच्या शेंड्या, कवट्या, गोणपाट, पत्रावळी, कागदी प्लेट, जुने पेपर, कागदी रिबीन या साहित्यांनी महोत्सवाचा सुरेख सेटअप उभारला आहे. महोत्सवात कुठेही फ्लेक्स, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केलेला नाही.

महोत्सवात आजसकाळी साडेआठ ते दोन : प्रत्यक्ष चित्र स्पर्धासकाळी साडेदहा : किचन कंपोस्ट कार्यशाळादुपारी दोन वाजता : नैसर्गिक रंग तयार करणे कार्यशाळासायंकाळी पाच : विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ व समारोप

टॅग्स :kolhapurकोल्हापूरartकला