शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

Agricultural electricity issue: ..तर ५ एप्रिलनंतर राज्यभर आगडोंब, राजू शेट्टींचे आंदोलन स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 12:26 IST

दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते.

कोल्हापूर : सरकारच्या बाबतीत मागचा अनुभव चांगला नाही, तरीदेखील १५ दिवस थांबा असे ते म्हणतात म्हणून थांबत आहे. आयआयटीचा अहवाल आला आणि मागणीप्रमाणे आश्वासन नाही पाळले तर ५ एप्रिलनंतर राज्यभर जनआंदोलनाला आगडोंब उसळेल, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. महावितरणसमोरील बेमुदत धरणे आंदोलनाची १५ व्या दिवशी सांगता करतानाच शेट्टी यांनी आंदोलनाच्या बी प्लॅनची घोषणा करून त्याची सुरुवात आज बुधवारपासूनच राज्यभरातील दौऱ्यापासून होणार असल्याचेही जाहीर केले.

दिवसा दहा तास विजेसाठी स्वाभिमानीने कोल्हापुरात महावितरणसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. सोमवारी उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाभिमानीने दिलेल्या प्रस्तावावर १५ दिवसात निर्णय घेऊ, तोपर्यंत आंदोलन स्थगित करा असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले होते; पण कार्यकर्त्यांशी बोलूनच पुढील निर्णय घेऊ असे शेट्टी यांनी सांगितले होते, त्यानुसार मंगळवारी सकाळी शेट्टी यांनी स्वाभिमानीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. त्यानंतर आंदोलनस्थळी येऊन आताचे आंदोलन स्थगित करून पुढील आंदोलनाची दिशाही स्पष्ट केली. याला सर्व शेतकऱ्यांनी हात उंचावत होकार दर्शवला. यावेळी विजयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

यावेळी जालंदर पाटील, जनार्दन पाटील, स्वस्तिक पाटील, सावकर मादनाईक, सागर शंभूशेटे, वैभव कांबळे, राजेंद्र गड्ड्यानवर, अजित पवार, विक्रांत पाटील, राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

म्हणून घेतला निर्णय

दहा तास वीज देण्यासाठी समितीचा अहवाल येण्यास १५ दिवस लागणार आहेत. एवढे थांबलो, आता आणखी १५ दिवस थांबलो तर काही बिघडणार नाही; पण आततायीपणा करून आजच दिवसा वीज द्या म्हटले आणि मोठा तांत्रिक बिघाड झाला, महाराष्ट्र अंधारात गेला तर त्याचे खापर शेतकऱ्यावर फोडले जाईल, ते मला नको होते, म्हणून दोन पाऊले मागे येण्याचा निर्णय घेतल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

५ एप्रिलला कोल्हापुरात कार्यकारिणीची बैठक

स्वाभिमानीची राज्य कार्यकारिणीची बैठक ५ एप्रिलला कोल्हापुरात होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संबंधित आंदोलने तीव्र करण्यासाठी मोठे जनआंदोलन उभारण्याचे ठरणार आहे. त्याची तयारी म्हणून आजपासून राज्यभर स्वत: शेट्टी दौरे सुरू करणार आहेत.

असा आहे प्लॅन बी

दिवसा विजेसह वीज बिल दुरुस्तीसाठी आंदोलन चालू ठेवणे

राज्यभर दौरे करून लाेकांमध्ये जनजागृती करणे

१५ दिवसात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणे

५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदानासाठी लढा उभारणे

शेतकरी हा उपेक्षित घटक ठेवल्याबद्दल मानहानी याचिका दाखल करणे

दोन टप्प्यातील एफआरपीची याचिका दाखल

दोन टप्प्यात एफआरपी देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. संघटनेतर्फे योगेश पांदे हे काम पाहणार आहेत. एप्रिलमध्ये ही याचिका सुनावणीसाठी पटलावर घेणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणीelectricityवीजRaju Shettyराजू शेट्टी