शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

साखर दरवाढीने ७०/३० च्या फॉर्म्युल्यास बळकटी?

By admin | Updated: March 9, 2017 00:37 IST

साखरेला ३७०० ते ४००० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर : दरात वाढ झाली असली तरी म्हणावी तशी उचल नाही

प्रकाश पाटील---कोपार्डे --साखर उत्पादनातील संभाव्य घटीचे चित्र निर्माण होताच साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले असून, शासनाने यात सकारात्मक भूमिका ठेवली तर येत्या दोन महिन्यांत प्रतिक्विंटल हे दर ४५०० वर पोहोचतील, असे या उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. या दरवाढीने किमान महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी ७०/३० फॉर्म्युल्याचा केंद्र शासनाचा निर्णय अमलात आणला तर आणखी १०० ते ३०० रुपये दर मिळणे सहज शक्य आहे.महाराष्ट्रासह देशात दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस शेतीवर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षी महाराष्ट्रात केवळ १५० साखर कारखाने आपला गाळप हंगाम सुरू करू शकले आहेत. पैकी १२२ साखर कारखान्यांनी आपले गाळप हंगाम फेब्रुवारीच्या मध्यावरच गुंडाळले आहेत, तर ऊस गाळपात सव्वादोनशे लाख मे. टनांनी घट झाली आहे. याचा परिणाम साखर उत्पादनावर झाला आहे. २५० लाख क्विंटल साखर उत्पादन कमी झाले असून, साखर टंचाई नसली तरी भविष्यात बाजारात साखर टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. सध्या एक्स फॅक्टरी साखरेचे दर ३७०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचल्याने साखर कारखान्यांना मागील दोन वर्षांतील आर्थिक तोटे भरून काढण्याबरोबर ऊस उत्पादकांना रंगराजन समितीच्या शिफारशीप्रमाणे ७०/३० च्या फॉर्म्युल्याने दर देण्यास बळकटी येईल असे चित्र आहे.कारखान्याचे सरासरी साखर उतारे १२ टक्क्यांपासून १२.५० टक्क्यांपर्यंत आहेत. याचा अर्थ एक टन उसापासून १२० किलो निव्वळ साखर मिळते. साखरेचा बाजारभाव ४५६० ते ४६८० पर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे. याचबरोबर मोलॅसिस, सहवीज प्रकल्प, बगॅस व डिस्टिलरी या उपउत्पादनातून मिळणारे एकत्रित ४०० ते ५०० रुपये उत्पन्न अंदाजे गृहीत धरल्यास एक टन उसापासून साखर कारखान्यांना किमान चार हजार ८०० ते पाच हजार २०० रुपये उत्पन्न मिळते. यातून साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च ८०० ते १३०० रुपये प्रतिटन वजा करता एक टन उसापासून साखर कारखान्यांना निव्वळ उत्पन्न ३८०० ते ४००० रुपये मिळत आहे. निव्वळ मिळणाऱ्या उत्पन्नातून साखर कारखान्यांना ३० टक्के व ऊस उत्पादकांना ७० टक्के रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार असा वाटा केल्यास ऊस उत्पादकांना प्रतिटन तीन हजार रुपये दर देणे आताच्या साखर दरामुळे शक्य आहे. महाराष्ट्रात काय, पण कोल्हापूर जिल्ह्याचा ऊसदराचा विचार केला तर एक-दोन कारखाने वगळता एकाही साखर कारखान्याचा ऊसदर २७०० रुपयांवर नाही. जर ७०/३० फॉर्म्युल्याची अंमलबजावणी झाली, तर सध्या साखर कारखान्यांना ३०० ते ४०० रुपये आणखी ऊस उत्पादकांना द्यावे लागणार आहेत.सहकारी साखर कारखाने हे ऊस उत्पादकांच्या हितासाठीच आहेत. ज्यावेळी साखरेला दर मिळतो, त्यावेळी तरी सकारात्मकता दाखवून ऊस उत्पादकांना उत्पादन खर्चाएवढा दर मिळेल, अशी भूमिका ठेवावी.- संजय पाटील, ऊस उत्पादक, वाकरे,