शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

समाधानी नसल्यास ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ...

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने बुधवारी जाहीर केला. या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देताना त्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याद्वारे त्यांना गुण, श्रेणी देण्यात येईल. त्याबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन आणखी चांगले गुण मिळविण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीबाबत बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता. त्यामुळे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा एक पर्याय होता. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे टॅलेंट सिद्ध करायचे होते. ९५ ते १०० टक्के गुण मिळवायचे होते. त्यांना मात्र, फटका बसला आहे.

-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

दहावीच्या परीक्षा व्हायला हव्या होत्या; पण वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य वाटतो. नव्या शैक्षणिक धोरणात या दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. त्यामुळे कोरोनामुळे प्रमोटेड हा शिक्का बसणार नाही.

-तेजस्विनी मोहिते, पालक, रुईकर कॉलनी.

चौकट

दहावीप्रमाणे बारावीचा निर्णय व्हावा

दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पेठवडगाव येथील बारावीचा विद्यार्थी स्वराज्य घोसाळकर याने व्यक्त केली.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

सीबीएसईच्या दहावीच्या शाळा : २८

विद्यार्थी संख्या : ३८००

बारावीच्या शाळा : १०

विद्यार्थी संख्या : ५५०

चौकट

दहावीच्या अंतर्गत परीक्षा

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या आहेत. त्यातील गुणांच्या आधारे अंतिम मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.